शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

मोदींची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न

By admin | Updated: March 20, 2016 04:00 IST

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक दिल्लीत शनिवारी सुरू असून, पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी सकाळी बैठकीच्या उद्घाटन सत्रात पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक दिल्लीत शनिवारी सुरू असून, पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी सकाळी बैठकीच्या उद्घाटन सत्रात पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतला. आसाममध्ये सत्ता मिळवणे आणि अन्य राज्यांत ताकद वाढवणे यादृष्टीने या बैठकीला महत्त्व आहे. बैठकीचा समारोप रविवारी पंतप्रधान मोदींच्या भाषणाने होणार होता. मात्र शनिवारी दुपारच्या सत्रानंतर पंतप्रधान अचानक बैठकीला आले. पक्ष बळकट झाला तरच केंद्र आणि राज्यातील सरकारे मजबूत होतील. त्यामुळे संघटना बांधणीला आणि वाढीला प्राधान्य दिले जावे, असे आवाहन त्यांनी केले.मोदी सरकारचे तिसरे बजेट, आसाम, केरळ, तामिळनाडू, प.बंगाल व पुड्डुचेरी येथील विधानसभा निवडणुका, वर्षभराने उत्तरप्रदेश आणि पंजाबात व्हावयाच्या निवडणुका, राजकीय सद्यस्थिती, पक्षाचे संघटन, जेएनयू प्रकरणानंतर पक्षाची भूमिका, अशा विविध विषयांवर या बैठकीत विचार मंथन होणार आहे. संघटन सचिव रामलाल व महासचिव भूपेंद्र यादव यांनी बैठकीसाठी राजकीय व आर्थिक प्रस्ताव तयार केले आहेत. राजकीय प्रस्तावात पक्षाला अभिप्रेत असलेल्या प्रखर राष्ट्रवादाची झलक आहे तर आर्थिक प्रस्तावात अर्थसंकल्पातील तरतुदींचे समर्थन आहे. ग्रामीण भाग व शेतकऱ्यांविषयी मोदी सरकार किती संवेदनशील आहे, याचा संदेश देशभर गावोगावी पोहोचावा, हा या प्रस्तावांचा उद्देश आहे. जेएनयू आणि भारत माता की जय घोषणेला ओवेसीकृत विरोध प्रकरणानंतर पक्षाला अभिप्रेत राष्ट्रवाद आणि राष्ट्रद्रोह या विषयावरही व्यापक चर्चा बैठकीत होणार आहे. पक्षाध्यक्षपदी अमित शाह यांची निवड झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक आहे. (विशेष प्रतिनिधी)भाजपने आसाम व केरळ या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकांवरच अधिक लक्ष केंद्रित केले आहे. बैठकीत या दोन राज्यांच्या रणनीतीवर प्रामुख्याने चर्चा होईल.परदेश दौरे करून पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय नेत्याच्या भूमिकेत स्वत:ला स्थापित केले. आता ग्रामीण भागाला साद घालत, शेतकरी व दलितांचा नेता अशी नवी प्रतिमा ते बनवू इच्छित आहेत. ‘सूट बूट की सरकार’ या राहुल गांधींच्या टीकेला छेद देणे हा उद्देश तर आहेच, शिवाय पंजाब व उत्तरप्रदेशच्या निवडणुकांसाठीही इमेज मेकओव्हरची मोदींना गरज वाटत आहे. बहुदा त्यामुळेच पंतप्रधानांनी शनिवारी सकाळी या बैठकीला येण्याऐवजी दिल्लीतील कृषी उन्नती मेळ्याला हजेरी लावली. येत्या दोन महिन्यातही मोदी अधिकांश वेळ शेतकरी व दलितांशी संबंधित कार्यक्रमांमध्ये दिसावेत, याच पद्धतीने देशभर सरकारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ते २१ मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षाशी संबंधित सर्वात मोठ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोपात पंतप्रधानांच्या या बदलत्या प्रतिमेचा प्रभाव पक्षाला व देशाला घडेल, अशी शक्यता आहे.