शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

मधुमेहाला आताच रोखण्याचा प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 02:32 IST

जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मधुमेहाला रोखण्यासाठी आतापासनच प्रयत्न करावेत, अन्यथा २0३0 सालपर्यंत हा सातवा मोठा मनुष्यहानी घडवून आणणारा आजार ठरू शकेल

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मधुमेहाला रोखण्यासाठी आतापासनच प्रयत्न करावेत, अन्यथा २0३0 सालपर्यंत हा सातवा मोठा मनुष्यहानी घडवून आणणारा आजार ठरू शकेल, असे इशारावजा आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने (वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन-व्हू) ने भारतासह सर्व दक्षिण आशियाई देशांना केले आहे. जागतिक आरोग्य दिन ७ एप्रिल रोजी आहे.मधुमेहाला रोखण्यासाठी लहान मुलांच्या खाद्यपदार्थांचेही नियमन करण्यात यावे, तसे केल्यास मुलांसाठीचे खाद्यपदार्थ विकत घेताना ते मधुमेहास पूरक आहेत वा नाहीत, हे ग्राहकांना कळू शकेल. मधुमेह ही हल्ली मोठी बातमी बनू शकत नाही. पण २0३0 सालपर्यंत याच आजाराने मरण पावणाऱ्यांचे प्रमाण मोठे असेल, हे लक्षात ठेवून शासन यंत्रणा, समाज आणि व्यक्ती या सर्वांनी आतापासूनच काळजी घ्यायला हवी, असे व्हूचे म्हणणे आहे. दर चार व्यक्तींपैकी एकाला मधुमेह असतो आणि त्यातील निम्म्या लोकांना आपणास हा आजार आहे, हेच माहीत नसते. अशा स्थितीत मधुमेह असाच वाढत राहिला तर त्याचे आर्थिक, सामाजिक आणि व्यक्तिगत असे खूपच वाईट परिणाम होतील, असा इशारा व्हूच्या दक्षिण आशियाई विभागाच्या प्रमुख पूनम खेत्रपाल सिंग यांनी दिला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)शारीरिक हालचाली कमी असणे आणि वजन फारच वाढणे यांमुळे टाइप टू पद्धतीचा मधुमेह होतो. तो टाळणे शक्य असते आणि वेळेत निदान झाल्यास त्यावर उपचारही शक्य आहेत. पण स्वत: काळजी व उपचार न घेतल्यास अवयव वा मज्जासंस्था निकामी होऊ शकते, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि अंधत्वही येते, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे नियमित, ठराविक व वेळेवर सकस आहार घेणे, शर्करायुक्त पेये टाळणे गरजेचे आहे. अर्थात हा आहारही गरजेनुसार आणि गरजेइतकाच घ्यावा, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.