दिल्ली : राज्यसभेत गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मदर तेरेसा यांच्यावर केलेल्या टीकेचे तीव्र पडसाद उमटले़ या मुद्यावर विरोधकांनी जोरदार गोंधळ घालत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली़तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन यांनी शून्य प्रहरादरम्यान हा मुद्दा उपस्थित केला़ सरकार आणि सरकारचे लोक राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान करीत आहेत़ मदर तेरेसांवरील टीका ही संपूर्ण भारताचा अपमान आहे़ स्वतंत्र भारतात ४३ लोकांना भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे़ यापैकी कुणावरही टीका झाल्यास तो संपूर्ण भारताचा अवमान असल्याचे ब्रायन म्हणाले़ याचदरम्यान भाजपचे विनय कटियार बोलायला उभे झाले; मात्र तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि डाव्या पक्षांनी त्यास विरोध केला़ समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल यांनी या मुद्यावर पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणाची मागणी केली़
मदर तेरेसांवरील टीकेवरून राज्यसभेत गोंधळ
By admin | Updated: February 27, 2015 01:52 IST