शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरी कुंभमेळ्यांच्या कामांमध्ये गांभीर्य नाही-सागरानंद सरस्वती

By admin | Updated: January 11, 2015 01:04 IST

त्र्यंबकेश्वर : बारा वर्षातून एकदा येणारा कुंभमेळा जागतिक महोत्सव असून, देश-विदेशातून लोक येत असतात. मागच्या कुंभमेळ्यात त्र्यंबकला १५ लाखापर्यंत भाविक आले होते यावेळेस प्रशासनाने गर्दीत वाढ होईल असे सुतोवाच केले आहे. असे सर्व असतानाही शासन त्र्यंबक नाशिक येथे होणार्‍या कुंभमेळ्याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांनी केला आहे.

त्र्यंबकेश्वर : बारा वर्षातून एकदा येणारा कुंभमेळा जागतिक महोत्सव असून, देश-विदेशातून लोक येत असतात. मागच्या कुंभमेळ्यात त्र्यंबकला १५ लाखापर्यंत भाविक आले होते यावेळेस प्रशासनाने गर्दीत वाढ होईल असे सुतोवाच केले आहे. असे सर्व असतानाही शासन त्र्यंबक नाशिक येथे होणार्‍या कुंभमेळ्याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांनी केला आहे. ते म्हणाले की, त्र्यंबकसाठी वाढीव निधी मंजुर करण्याकरिता अनेकवेळा पाठपुरावा केला. तथापी शासनाकडून अद्याप काहीच हालचाली नाही साधुंनी ७० ते ७५ शेड्स मागितले होते. निविदा निघाल्या फक्त २० शेड्सच्या पालिकेतर्फे ५० शेड्स मंजुर केल्या आहेत, आठ ठिकाणी कामे सुरू आहेत. दोन आखाड्यांकडे जागाच नसल्याने ते दोन आखाडे वगळून याठिकाणी कामे सुरू आहेत. उर्वरित शेड्सचे काम जिल्हाधिकार्‍यांच्या मंजुरीवर अवलंबून असल्याचे पालिका अभियंता जुन्नरे यांनी सांगितले. टॉयलेटसाठीही काही आखाड्यात जागा नाही. कामांची परिस्थिती धिम्या गतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हवे तेवढे लक्ष दिले जात नाही. अर्थात आपुरा निधी त्यात कामांची काटछाट करून त्र्यंबक पालिकेला अवघे ३५ कोटी (३४.६९ कोटी) दिले. अन्य ठिकाणी ७० ते ७५ कोटी दिले जातात. तर मग कुंभमेळा हा जागतिक महोत्सवाची जबाबदारी शासनाची नाही काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. हव्यासापायी ठिकठिकाणी वेगवेगळे वक्तव्य करीत आहेत, ते स्वत:ला अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष (स्वयंघोषित) मानतात मात्र अखिल भारतीय अखाडा परिषद सन २०१०च्या हरिद्वार कुंभमेळ्यातच बरखास्त झाल्याची आठवण महंत सागरानंदांनी यावेळी करून दिली. त्यामुळे त्यांनी फक्त नाशिकच्या तयारीची काळजी करावी, त्र्यंबकला येऊन लुडबुड करू नये असेही त्यांनी सांगितले. शिखर समितीतील फक्त अधिकार्‍यांची मुख्यमंत्र्यांनी मुंबईला बैठक घेतली. शिखर समितीत साधू-महंत व पालिका मुख्याधिकार्‍यांचा समावेश असताना कोणतेही निमंत्रण नव्हते याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. यापुढील बैठक त्र्यंबकलाच व्हावी!यापुढे होणार्‍या शिखर समितीची बैठक त्र्यंबकेश्वरलाच घ्यावी अशी आग्रही मागणी त्र्यंबकच्या दहा अखाड्यांनी केला आहे. बैठकीचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने ही बैठक होणे अनिवार्य आहे. नाशिकचे ३९, त्र्यंबकचे १० अखाडे यामध्ये त्र्यंबकला दहा अखाडे असल्याने बैठक त्र्यंबकलाच होणे औचित्य पूर्ण आहे. यावेळी महंत शंकरानंद सरस्वती उपस्थित होते. त्र्यंबक शहरात आजही खड्यांचे साम्राज्य आहे तीन दिवसांवर निवृत्तीनाथ यात्रा येऊन ठेपली असताना नागरिकांचे हाल होतील याकडेही त्यांनी लक्ष वेधले.