शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

त्या ‘तासापुरती’ आमदारांना शपथ देण्याची युक्ती!

By admin | Updated: April 13, 2015 23:54 IST

महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाची ‘युक्ती’ लोकसभा सचिवालयाला आवडली खरी, मात्र अशी शपथ दिल्याने आमदारांंच्या स्वातंत्र्यावर गदा तर येणार नाही, हे तपासूनच पुढचा निर्णय होणार आहे.

रघुनाथ पांडे - नवी दिल्लीगोंधळी आमदारांना आवरून विधिमंडळातील प्रश्नोत्तराचा तास ‘विनाव्यत्यय’ पार पाडण्यासाठी ‘त्या’ तासापुरती आमदारांना शपथ देता येईल का, ही महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाची ‘युक्ती’ लोकसभा सचिवालयाला आवडली खरी, मात्र अशी शपथ दिल्याने आमदारांंच्या स्वातंत्र्यावर गदा तर येणार नाही, हे तपासूनच पुढचा निर्णय होणार आहे.केवळ नियमावर बोट दाखवून कामकाज सुरळीत करण्यापेक्षा सदस्यांची सकारात्मक मानसिकता निर्माण करण्यासाठी अधिक प्रयत्न झाले पाहिजेत असा विचार पुढे आला. प्रश्नोत्तराच्या तासात किमान १०- १२ प्रश्न मार्गी लागावेत यासाठी केंद्रीय स्तरावर गंभीरपणे चर्चा सुरू असून, सोमवारी त्यासाठी अनेक सूचना करण्यात आल्या.विधिमंडळातील प्रश्नोत्तराचा तास सुरळीत पार पडावा म्हणून लोकसभा सचिवालयाने ११ विधानसभा अध्यक्षांची समिती तयार केली. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे याचे सदस्य आहेत. सोमवारी राज्यसभा उपाध्यक्ष पी. जे कुरियन यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची बैठक झाली. बागडे यांनी सांगितले की, ‘विधिमंडळ कामकाजाचा पहिला प्रश्नोत्तराचा तास सुरळीत पार पडावा यासाठी विरोधीपक्ष नेते, गटनेतेही त्यासाठी अनुकुल असतात. पण अनेकदा वेळेवर आलेल्या विषयामुळे तास प्रारंभ होताच व्यत्यय निर्माण होतो आणि या तासाचे कामकाज रखडते. प्रश्नोत्तराचा तास कोणत्याही परिस्थितीत वगळायचा नाही असा दंडकच केल्याने या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २०० च्या आसपास प्रश्न मार्गी लागले.