शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

लोकसहभागातून काढला साडे नऊ लाख घनमीटर गाळ ७३ गावांमध्ये काम सुरु : १६ कोटी ६६ लाखांचा खर्च

By admin | Updated: June 14, 2016 17:59 IST

जळगाव : दुष्काळामुळे कोरड्या झालेल्या नद्या व नाल्यांमधील गाळ काढण्याचे कामे ७३ गावांमध्ये लोकसहभागातून करण्यात आले आहे. १०४ ठिकाणी घेण्यात आलेल्या या खोलीकरणाच्या माध्यमातून तब्बल ९ लाख ४५ हजार २९२ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर जलयुक्त शिवार योजनेतंर्गत २३२ गावांतील ५९९ कामांच्या माध्यमातून २६ लाख ६४ हजार ९८३ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.

जळगाव : दुष्काळामुळे कोरड्या झालेल्या नद्या व नाल्यांमधील गाळ काढण्याचे कामे ७३ गावांमध्ये लोकसहभागातून करण्यात आले आहे. १०४ ठिकाणी घेण्यात आलेल्या या खोलीकरणाच्या माध्यमातून तब्बल ९ लाख ४५ हजार २९२ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर जलयुक्त शिवार योजनेतंर्गत २३२ गावांतील ५९९ कामांच्या माध्यमातून २६ लाख ६४ हजार ९८३ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.
चाळीसगाव व भडगाव तालुक्यात सर्वाधिक कामे
जिल्हा प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून नाला खोलीकरण तसेच अन्य कामे सुरु आहेत. त्यात चाळीसगाव तालुक्यातील सर्वाधिक २४ गावांमध्ये गाळ काढण्याचे कामे सुरु आहेत. त्यापाठोपाठ भडगाव तालुक्यात ११ गावांमध्ये काम सुरु आहे. या कामांमधून तब्बल दोन लाख ५५ हजार ३१५ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. पाचोरा तालुक्यातील पाच गावांमधून तीन लाख ८५ हजार ७८६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.

जलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात सर्वाधिक शासकीय कामे
जिल्हा प्रशासनातर्फे जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून नाला खोलीकरण, गाळ काढणे तसेच विहिर खोलीकरणाचे कामे सुरु आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यातील ५८ गावांमध्ये शासनातर्फे कामे सुरु आहेत. शासनातर्फे १६ लाख ९ हजार ६४५ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यापाठोपाठ जळगाव तालुक्यातील १२ गावांमधून एक लाख ५५ हजार ८ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.

१६ कोटी ६६ लाखांचा खर्च
शासकीय योजनेतून गाळ काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ९ कोटी २४ लाखांचा खर्च केला आहे. त्यात सर्वाधिक ३ कोटी ५० लाखांचा खर्च हा अमळनेर तालुक्यावर करण्यात आला आहे. तर एरंडोल तालुक्यात एक रुपयांचा देखील खर्च करण्यात आलेला नाही. लोकसहभागातून करण्यात आलेल्या कामांवर सात कोटी ४२ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक खर्च दोन कोटी ७७ लाख इतका खर्च पाचोरा तालुक्यात झाला आहे. तर एरंडोल व रावेर तालुक्यात ६६ हजारांचा खर्च करण्यात आला आहे.

एक लाख १७ हजार मीटरची रुंदी वाढली
शासकीय योजना व लोकसहभागातून गाळ काढल्यामुळे तब्बल एक लाख १७ हजार ५०९ मीटरचे रुंदीकरण व खोलीकरण झालेले आहे. याचा सर्वाधिक लाभ हा जामनेर तालुक्याला होणार आहे. त्यापाठोपाठ अमळनेर व भडगाव तालुक्यांना होणार आहे.