शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून काढला साडे नऊ लाख घनमीटर गाळ ७३ गावांमध्ये काम सुरु : १६ कोटी ६६ लाखांचा खर्च

By admin | Updated: June 14, 2016 17:59 IST

जळगाव : दुष्काळामुळे कोरड्या झालेल्या नद्या व नाल्यांमधील गाळ काढण्याचे कामे ७३ गावांमध्ये लोकसहभागातून करण्यात आले आहे. १०४ ठिकाणी घेण्यात आलेल्या या खोलीकरणाच्या माध्यमातून तब्बल ९ लाख ४५ हजार २९२ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर जलयुक्त शिवार योजनेतंर्गत २३२ गावांतील ५९९ कामांच्या माध्यमातून २६ लाख ६४ हजार ९८३ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.

जळगाव : दुष्काळामुळे कोरड्या झालेल्या नद्या व नाल्यांमधील गाळ काढण्याचे कामे ७३ गावांमध्ये लोकसहभागातून करण्यात आले आहे. १०४ ठिकाणी घेण्यात आलेल्या या खोलीकरणाच्या माध्यमातून तब्बल ९ लाख ४५ हजार २९२ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर जलयुक्त शिवार योजनेतंर्गत २३२ गावांतील ५९९ कामांच्या माध्यमातून २६ लाख ६४ हजार ९८३ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.
चाळीसगाव व भडगाव तालुक्यात सर्वाधिक कामे
जिल्हा प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून नाला खोलीकरण तसेच अन्य कामे सुरु आहेत. त्यात चाळीसगाव तालुक्यातील सर्वाधिक २४ गावांमध्ये गाळ काढण्याचे कामे सुरु आहेत. त्यापाठोपाठ भडगाव तालुक्यात ११ गावांमध्ये काम सुरु आहे. या कामांमधून तब्बल दोन लाख ५५ हजार ३१५ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. पाचोरा तालुक्यातील पाच गावांमधून तीन लाख ८५ हजार ७८६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.

जलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात सर्वाधिक शासकीय कामे
जिल्हा प्रशासनातर्फे जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून नाला खोलीकरण, गाळ काढणे तसेच विहिर खोलीकरणाचे कामे सुरु आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यातील ५८ गावांमध्ये शासनातर्फे कामे सुरु आहेत. शासनातर्फे १६ लाख ९ हजार ६४५ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यापाठोपाठ जळगाव तालुक्यातील १२ गावांमधून एक लाख ५५ हजार ८ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.

१६ कोटी ६६ लाखांचा खर्च
शासकीय योजनेतून गाळ काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ९ कोटी २४ लाखांचा खर्च केला आहे. त्यात सर्वाधिक ३ कोटी ५० लाखांचा खर्च हा अमळनेर तालुक्यावर करण्यात आला आहे. तर एरंडोल तालुक्यात एक रुपयांचा देखील खर्च करण्यात आलेला नाही. लोकसहभागातून करण्यात आलेल्या कामांवर सात कोटी ४२ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक खर्च दोन कोटी ७७ लाख इतका खर्च पाचोरा तालुक्यात झाला आहे. तर एरंडोल व रावेर तालुक्यात ६६ हजारांचा खर्च करण्यात आला आहे.

एक लाख १७ हजार मीटरची रुंदी वाढली
शासकीय योजना व लोकसहभागातून गाळ काढल्यामुळे तब्बल एक लाख १७ हजार ५०९ मीटरचे रुंदीकरण व खोलीकरण झालेले आहे. याचा सर्वाधिक लाभ हा जामनेर तालुक्याला होणार आहे. त्यापाठोपाठ अमळनेर व भडगाव तालुक्यांना होणार आहे.