शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
3
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
4
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
5
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
6
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
8
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
9
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
10
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
11
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
12
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
13
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
14
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
15
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
16
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
17
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
18
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
19
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
20
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 

पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार ही लाजिरवाणी बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2016 22:42 IST

जळगाव- देशात समानतेची मूल्ये रूजविणारे महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा उदोउदो केला जातो. पण दुसर्‍या बाजूला महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्याच्या मध्यवर्ती भागात महिलाविरोधी फतवे जातपंचायती काढत आहेत. समाजमूल्ये तुडवीली जात आहेत ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला लाजविणारी असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ.हमीद दाभोळकर यांनी शहरात व्यक्त केले.

जळगाव- देशात समानतेची मूल्ये रूजविणारे महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा उदोउदो केला जातो. पण दुसर्‍या बाजूला महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्याच्या मध्यवर्ती भागात महिलाविरोधी फतवे जातपंचायती काढत आहेत. समाजमूल्ये तुडवीली जात आहेत ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला लाजविणारी असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ.हमीद दाभोळकर यांनी शहरात व्यक्त केले.
अल्पबचत भवनात समता परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ.दाभोळकर सहभागी झाले. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष अरुण जाधव, अशोक पवार, अशोक बिर्‍हाडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी.जे.पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देवीदास महाजन, अंनिसचे डी.एस.कट्यारे, मिलिंद बागुल, भरत शिरसाठ, आय.सी.शेख, ए.एस.झोपे आदी उपस्थित होते.
मारेकरी सापडत नाहीत याची खंत
डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होऊन ३० महिने होत आले, पण अजूनही मारेकरी सापडले नाहीत. कलबुर्गी, पानसरे यांच्या हत्येबाबतही तपास व्यवस्थित होत नाही. ही खेदजनक बाब असल्याचे डॉ.हमीद दाभोळकर म्हणाले.

आंबेडकरांचे फक्त नाव घेतले जाते
एकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू यांच्या नावाचा शासन उदोउदो करीत आहे. आंबेडकर यांचे लंडनमधील घर घेतले. पण दुसर्‍या बाजूला समाजमूल्ये दुर्लक्षित आहेत. समाजमूल्ये रूजविण्याची गरज आहे. डॉ.दाभोळकर म्हणाले.

अंनिस देव, धर्माच्या विरोधात नाही
अंनिस देव, धर्माच्या विरोधात नाही. पण आमच्यावर धर्म बुडवायला निघाले, असा आरोप होतो. आमचा लढा देवाच्या नावाने होणारी फसवणूक, शोषण याविरोधात आहे, असेही त्यांनी सांगितले.

बाल कल्याण मंत्र्यांवर टिका
शनि चौथर्‍यावर महिलांनी जाणे योग्य नसल्याचे म्हणणार्‍या राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यांनी स्वत: आपल्या वडीलांना अग्नीडाग दिला आहे. याचा अर्थ समानतेची फक्त भाषा केली जाते. अंमलबजावणी केली जात नाही. राज्यात अजूनही स्त्री पुरूष समानतेबाबत प्रबोधनाची गरज असल्याचे डॉ.हमीद दाभोळकर बाल कल्याण मंत्र्यांवर टिका करताना म्हणाले.

शिक्षकांनी जातपात मोडण्यासाठी प्रयत्न करावेत
शिक्षकांनी जातपात मोडण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात करावी. राजकारण, समाजकारणात जातींना महत्त्व आले आहे. रोटी बेटी व्यवहार जातीनुसार होत असल्याने जाती पातींचा विषय पुढे येतो. अलीकडे तर महापुरूषांनाही जाती पातींमध्ये विभागण्यात आले आहे. जात पात नष्ट करण्यासाठी शिक्षकांनी प्रथम आपल्या मनातून जात काढून टाकावी. शिक्षकांनी विवेकशील समाज निर्मितीसाठी मूल्य रुजवायला हवेत, असेही त्यांनी सांगितले.