शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार ही लाजिरवाणी बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2016 22:42 IST

जळगाव- देशात समानतेची मूल्ये रूजविणारे महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा उदोउदो केला जातो. पण दुसर्‍या बाजूला महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्याच्या मध्यवर्ती भागात महिलाविरोधी फतवे जातपंचायती काढत आहेत. समाजमूल्ये तुडवीली जात आहेत ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला लाजविणारी असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ.हमीद दाभोळकर यांनी शहरात व्यक्त केले.

जळगाव- देशात समानतेची मूल्ये रूजविणारे महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा उदोउदो केला जातो. पण दुसर्‍या बाजूला महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्याच्या मध्यवर्ती भागात महिलाविरोधी फतवे जातपंचायती काढत आहेत. समाजमूल्ये तुडवीली जात आहेत ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला लाजविणारी असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ.हमीद दाभोळकर यांनी शहरात व्यक्त केले.
अल्पबचत भवनात समता परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ.दाभोळकर सहभागी झाले. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष अरुण जाधव, अशोक पवार, अशोक बिर्‍हाडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी.जे.पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देवीदास महाजन, अंनिसचे डी.एस.कट्यारे, मिलिंद बागुल, भरत शिरसाठ, आय.सी.शेख, ए.एस.झोपे आदी उपस्थित होते.
मारेकरी सापडत नाहीत याची खंत
डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होऊन ३० महिने होत आले, पण अजूनही मारेकरी सापडले नाहीत. कलबुर्गी, पानसरे यांच्या हत्येबाबतही तपास व्यवस्थित होत नाही. ही खेदजनक बाब असल्याचे डॉ.हमीद दाभोळकर म्हणाले.

आंबेडकरांचे फक्त नाव घेतले जाते
एकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू यांच्या नावाचा शासन उदोउदो करीत आहे. आंबेडकर यांचे लंडनमधील घर घेतले. पण दुसर्‍या बाजूला समाजमूल्ये दुर्लक्षित आहेत. समाजमूल्ये रूजविण्याची गरज आहे. डॉ.दाभोळकर म्हणाले.

अंनिस देव, धर्माच्या विरोधात नाही
अंनिस देव, धर्माच्या विरोधात नाही. पण आमच्यावर धर्म बुडवायला निघाले, असा आरोप होतो. आमचा लढा देवाच्या नावाने होणारी फसवणूक, शोषण याविरोधात आहे, असेही त्यांनी सांगितले.

बाल कल्याण मंत्र्यांवर टिका
शनि चौथर्‍यावर महिलांनी जाणे योग्य नसल्याचे म्हणणार्‍या राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यांनी स्वत: आपल्या वडीलांना अग्नीडाग दिला आहे. याचा अर्थ समानतेची फक्त भाषा केली जाते. अंमलबजावणी केली जात नाही. राज्यात अजूनही स्त्री पुरूष समानतेबाबत प्रबोधनाची गरज असल्याचे डॉ.हमीद दाभोळकर बाल कल्याण मंत्र्यांवर टिका करताना म्हणाले.

शिक्षकांनी जातपात मोडण्यासाठी प्रयत्न करावेत
शिक्षकांनी जातपात मोडण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात करावी. राजकारण, समाजकारणात जातींना महत्त्व आले आहे. रोटी बेटी व्यवहार जातीनुसार होत असल्याने जाती पातींचा विषय पुढे येतो. अलीकडे तर महापुरूषांनाही जाती पातींमध्ये विभागण्यात आले आहे. जात पात नष्ट करण्यासाठी शिक्षकांनी प्रथम आपल्या मनातून जात काढून टाकावी. शिक्षकांनी विवेकशील समाज निर्मितीसाठी मूल्य रुजवायला हवेत, असेही त्यांनी सांगितले.