शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

बदायूं पीडितांची थडगी पाण्याखाली

By admin | Updated: July 20, 2014 01:53 IST

उत्तर प्रदेशातील बहुचर्चित बदायूं बलात्कार - हत्या प्रकरणातील दोन पीडित मुलींचे पुरलेले मृतदेह बाहेर काढून त्यांचे नव्याने शवविच्छेदन करण्याच्या प्रयत्नांवर आज शनिवारी पाणी फेरले गेल़े

बदायूं : उत्तर प्रदेशातील बहुचर्चित बदायूं बलात्कार - हत्या प्रकरणातील दोन पीडित मुलींचे पुरलेले मृतदेह बाहेर काढून त्यांचे नव्याने शवविच्छेदन करण्याच्या प्रयत्नांवर आज शनिवारी पाणी फेरले गेल़े शवविच्छेदन प्रक्रिया आज सुरू केली गेली़ पण गंगेचे पात्र फुगल्यामुळे या पीडित मुलींची थडगी पाण्यात बुडाली आणि सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले गेल़े
उत्तर प्रदेशच्या बदायूं बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास करणा:या सीबीआयने याप्रकरणी एक वैद्यकीय समिती (मेडिकल बोर्ड) गठित केली आह़े ही समिती उद्या रविवारी दोन्ही पीडितांचे पुरलेले मृतदेह बाहेर काढून त्यांचे नव्याने शवविच्छेदन करणार होती़ मात्र गंगेचा जलस्तर वाढल्यास संबंधित पीडितांना पुरले ती जागा पाण्याखाली जाण्याची शक्यता बघता, वैद्यकीय समितीने आजच मृतदेह बाहेर काढण्याचा निर्णय घेतला़ पण गंगेच्या प्रवाहाची गती बघता, ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही़
पोलीस अधीक्षक (शहर) मानसिंह चौहान सांगितले की, मुसळधार पाऊस तसेच हरिद्वारच्या धरणातून सोडण्यात आलेले पाणी यामुळे गंगेचा जलस्तर अचानक वाढला़ यामुळे अटैना घाटावर पीडित मुलींची थडगी सुमारे तीन फूट पाण्यात बुडाली़ याउपरही ती खोदून पुरलेले मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न केले गेल़े मात्र पाण्याच्या प्रवाहाची गती बघता अखेर हे प्रयत्न थांबवावे लागल़े उद्या ही प्रक्रिया पुन्हा सुरू होईल वा नाही, याबाबत सीबीआय निर्णय घेईल़
सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, फोरेन्सिक तज्ज्ञांनी याप्रकरणी कुठल्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी नव्याने शवविच्छेदन करण्याची गरज असल्याची शिफारस केली आह़े त्यामुळेच पुरलेले मृतदेह बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला़  गत 27 मे रोजी 14 आणि 15 वर्षाच्या दोन्ही अल्पवयीन पीडिता घरांतून बेपत्ता झाल्या होत्या़ दुस:याच दिवशी त्यांचे मृतदेह गावातील एका झाडाला गळफास लावलेले आढळले होत़े 
स्मृती इराणींची टीका
अमेठी/ लखनौ : उत्तर प्रदेशात महिला व बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ बघता, राज्यातील कायदा व व्यवस्था ठीक नसल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले आह़े  (वृत्तसंस्था)
गत लोकसभा निवडणुकीत इराणी यांनी अमेठीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना कडवी झुंज दिली होती़ यानंतर आज शनिवारी त्या प्रथमच अमेठीत आल्या़  उत्तर प्रदेशातील कायदा व व्यवस्था इतर राज्यांच्या तुलनेत चांगली आहे, हा सपा प्रमुख मुलायमसिंग यादव यांचा दावा स्मृती इराणींनी यावेळी खोडून काढला़ मुलायमसिंग ज्येष्ठ नेते आहेत़ त्यांनी कुठलेही वक्तव्य विचारपूर्वक करायला हव़े (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4लखनौ : लखनौच्या मोहनलालगंजमध्ये एका महिलेची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शनिवारी राज्यपाल अजीज कुरैशी यांची भेट घेतली. 
4राज्यपालांनी शुक्रवारी या प्रकरणीचा अहवाल मागितला होता.  ही भेट सुमारे 4क् मिनिटे चालली़ या भेटीबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिली गेली नसली तरी मोहनलालगंज प्रकरणावर यावेळी चर्चा झाल्याचे समजत़े