शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

बदायूं पीडितांची थडगी पाण्याखाली

By admin | Updated: July 20, 2014 01:53 IST

उत्तर प्रदेशातील बहुचर्चित बदायूं बलात्कार - हत्या प्रकरणातील दोन पीडित मुलींचे पुरलेले मृतदेह बाहेर काढून त्यांचे नव्याने शवविच्छेदन करण्याच्या प्रयत्नांवर आज शनिवारी पाणी फेरले गेल़े

बदायूं : उत्तर प्रदेशातील बहुचर्चित बदायूं बलात्कार - हत्या प्रकरणातील दोन पीडित मुलींचे पुरलेले मृतदेह बाहेर काढून त्यांचे नव्याने शवविच्छेदन करण्याच्या प्रयत्नांवर आज शनिवारी पाणी फेरले गेल़े शवविच्छेदन प्रक्रिया आज सुरू केली गेली़ पण गंगेचे पात्र फुगल्यामुळे या पीडित मुलींची थडगी पाण्यात बुडाली आणि सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले गेल़े
उत्तर प्रदेशच्या बदायूं बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास करणा:या सीबीआयने याप्रकरणी एक वैद्यकीय समिती (मेडिकल बोर्ड) गठित केली आह़े ही समिती उद्या रविवारी दोन्ही पीडितांचे पुरलेले मृतदेह बाहेर काढून त्यांचे नव्याने शवविच्छेदन करणार होती़ मात्र गंगेचा जलस्तर वाढल्यास संबंधित पीडितांना पुरले ती जागा पाण्याखाली जाण्याची शक्यता बघता, वैद्यकीय समितीने आजच मृतदेह बाहेर काढण्याचा निर्णय घेतला़ पण गंगेच्या प्रवाहाची गती बघता, ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही़
पोलीस अधीक्षक (शहर) मानसिंह चौहान सांगितले की, मुसळधार पाऊस तसेच हरिद्वारच्या धरणातून सोडण्यात आलेले पाणी यामुळे गंगेचा जलस्तर अचानक वाढला़ यामुळे अटैना घाटावर पीडित मुलींची थडगी सुमारे तीन फूट पाण्यात बुडाली़ याउपरही ती खोदून पुरलेले मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न केले गेल़े मात्र पाण्याच्या प्रवाहाची गती बघता अखेर हे प्रयत्न थांबवावे लागल़े उद्या ही प्रक्रिया पुन्हा सुरू होईल वा नाही, याबाबत सीबीआय निर्णय घेईल़
सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, फोरेन्सिक तज्ज्ञांनी याप्रकरणी कुठल्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी नव्याने शवविच्छेदन करण्याची गरज असल्याची शिफारस केली आह़े त्यामुळेच पुरलेले मृतदेह बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला़  गत 27 मे रोजी 14 आणि 15 वर्षाच्या दोन्ही अल्पवयीन पीडिता घरांतून बेपत्ता झाल्या होत्या़ दुस:याच दिवशी त्यांचे मृतदेह गावातील एका झाडाला गळफास लावलेले आढळले होत़े 
स्मृती इराणींची टीका
अमेठी/ लखनौ : उत्तर प्रदेशात महिला व बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ बघता, राज्यातील कायदा व व्यवस्था ठीक नसल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले आह़े  (वृत्तसंस्था)
गत लोकसभा निवडणुकीत इराणी यांनी अमेठीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना कडवी झुंज दिली होती़ यानंतर आज शनिवारी त्या प्रथमच अमेठीत आल्या़  उत्तर प्रदेशातील कायदा व व्यवस्था इतर राज्यांच्या तुलनेत चांगली आहे, हा सपा प्रमुख मुलायमसिंग यादव यांचा दावा स्मृती इराणींनी यावेळी खोडून काढला़ मुलायमसिंग ज्येष्ठ नेते आहेत़ त्यांनी कुठलेही वक्तव्य विचारपूर्वक करायला हव़े (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4लखनौ : लखनौच्या मोहनलालगंजमध्ये एका महिलेची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शनिवारी राज्यपाल अजीज कुरैशी यांची भेट घेतली. 
4राज्यपालांनी शुक्रवारी या प्रकरणीचा अहवाल मागितला होता.  ही भेट सुमारे 4क् मिनिटे चालली़ या भेटीबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिली गेली नसली तरी मोहनलालगंज प्रकरणावर यावेळी चर्चा झाल्याचे समजत़े