शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

यंदाही कडाडणार डाळी !

By admin | Updated: April 17, 2016 03:45 IST

सर्वसामान्य भारतीयांचे हक्काचे प्रोटीन म्हणजे डाळ. गतवर्षीप्रमाणे यंदाही डाळींचे भाव पुन्हा एकदा प्रतिकिलो २00 रुपयांची मर्यादा ओलांडणार आहेत. व्यापाऱ्यांकडे डाळींचा साठा नसल्याने,

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली

सर्वसामान्य भारतीयांचे हक्काचे प्रोटीन म्हणजे डाळ. गतवर्षीप्रमाणे यंदाही डाळींचे भाव पुन्हा एकदा प्रतिकिलो २00 रुपयांची मर्यादा ओलांडणार आहेत. व्यापाऱ्यांकडे डाळींचा साठा नसल्याने, सध्याच्या भावात लवकरच २५ ते ३0 टक्क्यांची वाढ होईल, अशी भीती इंडियन डाळ मिलच्या एका प्रतिनिधीने वर्तविली आहे. बाजारपेठेत डाळींची उपलब्धता लक्षात घेता, उडदाच्या डाळीच्या किरकोळ विक्रीचा भाव यंदा २५0 रुपये प्रतिकिलोची विक्रमी उंची गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षीपर्यंत व्यापारी या काळात विविध देशांमधून किमान २५ लाख टन आयात डाळींचा साठा करीत असत. गतवर्षी डाळींचे भाव २00 रुपये किलोवर पोहोचताच सरकारने व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. साठेबाजीच्या आरोपाची तशीच संकटे यंदा निर्माण होऊ नयेत, यासाठी व्यापारी यंदा डाळींचा अधिक साठा करायला तयार नाहीत. डाळींची मर्यादित आयात झाल्यामुळे जेमतेम १0 लाख टन डाळींचा साठा सध्या बाजारपेठेत आहे असे सांगण्यात येते. थोडक्यात, मोदी सरकारच्या काळात यंदाही डाळींच्या उपलब्धतेची अवस्था कठीणच दिसत आहे.साठा का करणार नाहीत?गतवर्षी डाळींच्या भावाने प्रथमच २00 रुपये किलोची पातळी गाठली होती. त्यामुळे देशभर हाहाकार उडाला होता. या पार्श्वभूमीवर डाळींचा साठा केला, तर भरपूर दंड भरावा लागेल. प्रसंगी तुरुंगाची हवाही खावी लागेल, या भीतीने व्यापाऱ्यांनी यंदा डाळींचा साठा करण्याचे टाळले. इतकेच नव्हे, तर गतवर्षीच्या तुलनेत डाळींची आयात कमी केली.- मार्च महिन्यापासून हरभऱ्याचे नवे पीक हाती आल्यानंतर वस्तूत: चणा डाळीचे दर उतरायला लागतात. यंदा एप्रिल महिन्याचा मध्य उजाडला, तरी तशी चिन्हे दिसत नाहीत.