शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
2
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
3
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
4
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
5
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
6
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?
7
Ritual: 'हुंडा देणे' ही कुप्रथा भारतीय संस्कृतीत वा इतिहासात नव्हतीच, मग आली कुठून?
8
शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले? डिमॅट अकाउंट कायमचं कसं बंद करायचं? 'ही' आहे सोपी पद्धत
9
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
10
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
11
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
12
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
13
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
14
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती
15
मोठा खुलासा! ज्योती मल्होत्राने देशातील 'या' प्रसिद्ध मंदिरात घेतलेलं दर्शन, फोटोही कढले अन्...
16
IPL 2025 गाजवून बिहारच्या घरी परतला वैभव सूर्यवंशी; साऱ्यांनी केलं धमाकेदार स्वागत (Video)
17
2014 पूर्वी पाकिस्तानला योग्य उत्तर दिले नाही, BSF च्या कार्यक्रमातून अमित शाहांचा हल्लाबोल
18
'पाकिस्तान जिंदाबाद,' चिकलठाण्यात शिकाऊ कामगाराचे कंपनीतील मशीनवर देशद्रोही लिखाण!
19
‘हुंडामुक्त महाराष्ट्र - हिंसामुक्त कुटुंब’, सुप्रिया सुळे यांनी केला राज्यव्यापी लढ्याचा निर्धार, २२ जून पासून होणार सुरुवात
20
'शालू'च्या नव्या डान्सने घातला इंटरनेटवर धुमाकूळ, राजेश्वरीच्या मॉडर्न लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा

यंदाही कडाडणार डाळी !

By admin | Updated: April 17, 2016 03:45 IST

सर्वसामान्य भारतीयांचे हक्काचे प्रोटीन म्हणजे डाळ. गतवर्षीप्रमाणे यंदाही डाळींचे भाव पुन्हा एकदा प्रतिकिलो २00 रुपयांची मर्यादा ओलांडणार आहेत. व्यापाऱ्यांकडे डाळींचा साठा नसल्याने,

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली

सर्वसामान्य भारतीयांचे हक्काचे प्रोटीन म्हणजे डाळ. गतवर्षीप्रमाणे यंदाही डाळींचे भाव पुन्हा एकदा प्रतिकिलो २00 रुपयांची मर्यादा ओलांडणार आहेत. व्यापाऱ्यांकडे डाळींचा साठा नसल्याने, सध्याच्या भावात लवकरच २५ ते ३0 टक्क्यांची वाढ होईल, अशी भीती इंडियन डाळ मिलच्या एका प्रतिनिधीने वर्तविली आहे. बाजारपेठेत डाळींची उपलब्धता लक्षात घेता, उडदाच्या डाळीच्या किरकोळ विक्रीचा भाव यंदा २५0 रुपये प्रतिकिलोची विक्रमी उंची गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षीपर्यंत व्यापारी या काळात विविध देशांमधून किमान २५ लाख टन आयात डाळींचा साठा करीत असत. गतवर्षी डाळींचे भाव २00 रुपये किलोवर पोहोचताच सरकारने व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. साठेबाजीच्या आरोपाची तशीच संकटे यंदा निर्माण होऊ नयेत, यासाठी व्यापारी यंदा डाळींचा अधिक साठा करायला तयार नाहीत. डाळींची मर्यादित आयात झाल्यामुळे जेमतेम १0 लाख टन डाळींचा साठा सध्या बाजारपेठेत आहे असे सांगण्यात येते. थोडक्यात, मोदी सरकारच्या काळात यंदाही डाळींच्या उपलब्धतेची अवस्था कठीणच दिसत आहे.साठा का करणार नाहीत?गतवर्षी डाळींच्या भावाने प्रथमच २00 रुपये किलोची पातळी गाठली होती. त्यामुळे देशभर हाहाकार उडाला होता. या पार्श्वभूमीवर डाळींचा साठा केला, तर भरपूर दंड भरावा लागेल. प्रसंगी तुरुंगाची हवाही खावी लागेल, या भीतीने व्यापाऱ्यांनी यंदा डाळींचा साठा करण्याचे टाळले. इतकेच नव्हे, तर गतवर्षीच्या तुलनेत डाळींची आयात कमी केली.- मार्च महिन्यापासून हरभऱ्याचे नवे पीक हाती आल्यानंतर वस्तूत: चणा डाळीचे दर उतरायला लागतात. यंदा एप्रिल महिन्याचा मध्य उजाडला, तरी तशी चिन्हे दिसत नाहीत.