शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

तीन पाक घुसखोरांना कंठस्नान

By admin | Updated: July 13, 2016 02:55 IST

भारताच्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) अजनाला क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत तीन पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्नान घातले

अमृतसर : भारताच्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) अजनाला क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत तीन पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्नान घातले. अमृतसरपासून २६ कि.मी. अंतरावर मंगळवारी पहाटे ही घटना घडली. तीन पाकिस्तानी घुसखोर भारतीय हद्दीत घुसल्याचे बीएसएफच्या गस्ती पथकाला आढळून आले. पथकाने त्यांना शरणागती पत्करण्याचा इशारा दिला. मात्र, इशारा न जुमानता ते जवानांच्या दिशेने चालत आले आणि गोळीबार केला. त्यानंतर, उडालेल्या चकमकीत तिन्ही घुसखोर ठार झाले, अशी माहिती बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने दिली. एकूण पाच जणांनी घुसखोरी केली होती. त्यातील तिघे मारले गेले, तर दोन जण पाकच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले, असेही हा अधिकारी म्हणाला. ठार करण्यात आलेल्या घुसखोरांजवळ दोन मोबाइल आणि भारतीय चलन आढळून आले. बीएसएफचे (पंजाब फ्रंटियर) महानिरीक्षक अनिल पालीवाल आणि इतर अधिकारी घटनास्थळी आले आहेत. तिन्ही घुसखोर विशीतील होते. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. तिघांच्याही अंगात पारंपरिक कपडे होते. भारत-पाक सीमेवरील दरिया मन्सूर सीमा चौकीजवळ ही घटना घडली.