शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

गिरणा धरणातून तीन आर्वतन सोडा आमदारांची मुंबईच्या बैठकीत जोरदार मागणी : नाशिकने केले अतिरिक्त पाणी आरक्षण

By admin | Updated: December 1, 2015 23:35 IST

जळगाव : जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई आणि नाशिक येथील पाच धरणांमधून २५ टक्के पाण्याच्या मागणीवरून १ डिसेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर तब्बल पाच तास सुनावणी चालली. यावेळी जळगावचे लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाने पाण्याचे अतिरिक्त आरक्षण जाहीर केल्याचा आरोप करीत तीन आवर्तन सोडण्याची मागणी लावून धरली.

जळगाव : जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई आणि नाशिक येथील पाच धरणांमधून २५ टक्के पाण्याच्या मागणीवरून १ डिसेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर तब्बल पाच तास सुनावणी चालली. यावेळी जळगावचे लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाने पाण्याचे अतिरिक्त आरक्षण जाहीर केल्याचा आरोप करीत तीन आवर्तन सोडण्याची मागणी लावून धरली.
गिरणा धरणांवर अवलंबून असलेल्या चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, पारोळा, एरंडोल, धरणगाव या तालुक्यातील गावांमधील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील पाच धरणांमधील २५ टक्के पाणी गिरणा धरणात सोडण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण समितीसमोर २० ऑगस्ट रोजी स्वतंत्र याचिका दाखल केली होती. या याचिकेवर यापूर्वी दोन सुनावणी झाल्या आहेत. मंगळवार १ डिसेंबर रोजी अंतिम सुनावणी होती.

माथा ते पायथा हा विचार करा - गुलाबराव पाटील
समान न्याय वाटप तत्वानुसार गिरणा धरणातून तीन आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली. आवर्तन सोडताना माथा ते पायथा हे तत्व गृहित धरल्यास आम्ही पायथ्याजवळ आहोत. त्यामुळे आवर्तन सोडल्यानंतर पाणी पायथ्यापर्यंत सोडून न्याय देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.

प्रांतिक वाद करायचा नाही : आमदार उन्मेष पाटील
गिरणा धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्यावर मालेगाव, नांदगाव, चाळीसगाव, भडगाव, धरणगाव, पारोळा, पाचोरा या नगरपालिकांसोबत काही गावांमधील नागरिक अवलंबून आहेत. आम्ही शेतीसाठी नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही मागणी करीत आहोत. पाणी मागणीच्या संदर्भात आम्हाला कोणताही प्रांतिक वाद करायचा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाणी न सोडल्यास भीषण टंचाई : आमदार किशोर पाटील
नाशिक जिल्ह्यातील पाच धरणांमधून पाणी न सोडल्यास उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होणार असल्याचे सांगितले. सध्या एक आवर्तन सोडण्यात आले आहे. गिरणा धरणातील सद्यस्थितीला असलेला जलसाठा लक्षात घेता मार्च महिन्यापर्यंत दुसरे आवर्तन सोडता येईल. मात्र मार्च महिन्यानंतर पिण्याच्या पाण्याचे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडल्यास जून महिन्यांपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल असे त्यांनी सांगितले.