शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा धरणातून तीन आर्वतन सोडा आमदारांची मुंबईच्या बैठकीत जोरदार मागणी : नाशिकने केले अतिरिक्त पाणी आरक्षण

By admin | Updated: December 1, 2015 23:35 IST

जळगाव : जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई आणि नाशिक येथील पाच धरणांमधून २५ टक्के पाण्याच्या मागणीवरून १ डिसेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर तब्बल पाच तास सुनावणी चालली. यावेळी जळगावचे लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाने पाण्याचे अतिरिक्त आरक्षण जाहीर केल्याचा आरोप करीत तीन आवर्तन सोडण्याची मागणी लावून धरली.

जळगाव : जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई आणि नाशिक येथील पाच धरणांमधून २५ टक्के पाण्याच्या मागणीवरून १ डिसेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर तब्बल पाच तास सुनावणी चालली. यावेळी जळगावचे लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाने पाण्याचे अतिरिक्त आरक्षण जाहीर केल्याचा आरोप करीत तीन आवर्तन सोडण्याची मागणी लावून धरली.
गिरणा धरणांवर अवलंबून असलेल्या चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, पारोळा, एरंडोल, धरणगाव या तालुक्यातील गावांमधील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील पाच धरणांमधील २५ टक्के पाणी गिरणा धरणात सोडण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण समितीसमोर २० ऑगस्ट रोजी स्वतंत्र याचिका दाखल केली होती. या याचिकेवर यापूर्वी दोन सुनावणी झाल्या आहेत. मंगळवार १ डिसेंबर रोजी अंतिम सुनावणी होती.

माथा ते पायथा हा विचार करा - गुलाबराव पाटील
समान न्याय वाटप तत्वानुसार गिरणा धरणातून तीन आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली. आवर्तन सोडताना माथा ते पायथा हे तत्व गृहित धरल्यास आम्ही पायथ्याजवळ आहोत. त्यामुळे आवर्तन सोडल्यानंतर पाणी पायथ्यापर्यंत सोडून न्याय देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.

प्रांतिक वाद करायचा नाही : आमदार उन्मेष पाटील
गिरणा धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्यावर मालेगाव, नांदगाव, चाळीसगाव, भडगाव, धरणगाव, पारोळा, पाचोरा या नगरपालिकांसोबत काही गावांमधील नागरिक अवलंबून आहेत. आम्ही शेतीसाठी नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही मागणी करीत आहोत. पाणी मागणीच्या संदर्भात आम्हाला कोणताही प्रांतिक वाद करायचा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाणी न सोडल्यास भीषण टंचाई : आमदार किशोर पाटील
नाशिक जिल्ह्यातील पाच धरणांमधून पाणी न सोडल्यास उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होणार असल्याचे सांगितले. सध्या एक आवर्तन सोडण्यात आले आहे. गिरणा धरणातील सद्यस्थितीला असलेला जलसाठा लक्षात घेता मार्च महिन्यापर्यंत दुसरे आवर्तन सोडता येईल. मात्र मार्च महिन्यानंतर पिण्याच्या पाण्याचे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडल्यास जून महिन्यांपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल असे त्यांनी सांगितले.