शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

मानवी वस्त्यांतील मगरी हटविणार

By admin | Updated: August 15, 2016 06:14 IST

दक्षिण अंदमान जिल्ह्यात मगरींचे माणसावरील हल्ले वाढल्याने येथील मानवी वस्तीतील मगरींना वन विभागाकडून हटविण्यात येणार आहे.

पोर्ट ब्लेअर : दक्षिण अंदमान जिल्ह्यात मगरींचे माणसावरील हल्ले वाढल्याने येथील मानवी वस्तीतील मगरींना वन विभागाकडून हटविण्यात येणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटांचे मुख्य वन संवर्धक एम. एस. नेगी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मानवी वस्त्यांतील मगरींचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच येथे आढळून आलेल्या मगरींना हटविण्यास सांगण्यात आले आहे. मगरींच्या हल्ल्याच्या घटनांत वाढ झाल्यानंतर नेगी यांनी याच आठवड्यात दक्षिण अंदमानातील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या होत्या. मानव आणि मगरीतील संघर्षांविरोधात करण्यात आलेल्या उपाययोजनांचीही त्यांनी माहिती घेतली. कोर्बिन्स कोव्ह, न्यू वंदूर आणि मुंदापहार येथील भेटीत त्यांनी अधिकाऱ्यांना धोकादायक ठिकाणी पोहण्यास प्रतिबंध घालणारे फलक लावण्याच्या सूचना दिल्या, तसेच धोक्याच्या सूचना देणारे फलक लावण्यासही सांगितले. सुरक्षिततेसाठी बसविण्यात आलेल्या जाळ्या नादुरुस्त झाल्या असल्यास त्यांची डागडुजी करण्याच्या सूचना नेगी यांनी दिल्या. मगरींचा वावर असलेल्या खाड्यांच्या काही भागांत कुंपण घालण्यात आले आहे. शाळकरी मुलांनी अशा ठिकाणी प्रवेश करू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)>संघर्षाचे प्रमुख कारणखाड्यांत टाकण्यात येणारा कचरा आणि खरकटे मानव-मगरींतील संघर्षाचे प्रमुख कारण असल्याचे नेगी यांनी सांगितले. ते म्हणाले की, या कचऱ्यामुळे मगरी आकर्षित होतात. विशेषत: कचरा टाकला जात असतानाच त्या तिकडे धाव घेतात आणि हल्ले करतात.