शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मानवी वस्त्यांतील मगरी हटविणार

By admin | Updated: August 15, 2016 06:14 IST

दक्षिण अंदमान जिल्ह्यात मगरींचे माणसावरील हल्ले वाढल्याने येथील मानवी वस्तीतील मगरींना वन विभागाकडून हटविण्यात येणार आहे.

पोर्ट ब्लेअर : दक्षिण अंदमान जिल्ह्यात मगरींचे माणसावरील हल्ले वाढल्याने येथील मानवी वस्तीतील मगरींना वन विभागाकडून हटविण्यात येणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटांचे मुख्य वन संवर्धक एम. एस. नेगी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मानवी वस्त्यांतील मगरींचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच येथे आढळून आलेल्या मगरींना हटविण्यास सांगण्यात आले आहे. मगरींच्या हल्ल्याच्या घटनांत वाढ झाल्यानंतर नेगी यांनी याच आठवड्यात दक्षिण अंदमानातील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या होत्या. मानव आणि मगरीतील संघर्षांविरोधात करण्यात आलेल्या उपाययोजनांचीही त्यांनी माहिती घेतली. कोर्बिन्स कोव्ह, न्यू वंदूर आणि मुंदापहार येथील भेटीत त्यांनी अधिकाऱ्यांना धोकादायक ठिकाणी पोहण्यास प्रतिबंध घालणारे फलक लावण्याच्या सूचना दिल्या, तसेच धोक्याच्या सूचना देणारे फलक लावण्यासही सांगितले. सुरक्षिततेसाठी बसविण्यात आलेल्या जाळ्या नादुरुस्त झाल्या असल्यास त्यांची डागडुजी करण्याच्या सूचना नेगी यांनी दिल्या. मगरींचा वावर असलेल्या खाड्यांच्या काही भागांत कुंपण घालण्यात आले आहे. शाळकरी मुलांनी अशा ठिकाणी प्रवेश करू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)>संघर्षाचे प्रमुख कारणखाड्यांत टाकण्यात येणारा कचरा आणि खरकटे मानव-मगरींतील संघर्षाचे प्रमुख कारण असल्याचे नेगी यांनी सांगितले. ते म्हणाले की, या कचऱ्यामुळे मगरी आकर्षित होतात. विशेषत: कचरा टाकला जात असतानाच त्या तिकडे धाव घेतात आणि हल्ले करतात.