शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
4
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
5
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
6
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
7
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
8
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
9
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
10
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
11
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
12
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
13
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
14
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
15
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
16
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
18
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
19
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
20
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

बारा गावांची पाणीटंचाई होणार दूर

By admin | Updated: September 16, 2015 23:38 IST

भोर तालुका : जलयुक्त शिवार योजनेतून भरीव कामे

भोर तालुका : जलयुक्त शिवार योजनेतून भरीव कामे
भोर : जलयुक्त शिवार योजनेतंर्गत भोर तालुक्यातील १२ गावांत कृषी छोटे पाटबंधारे, वन विभाग यांच्यासह विविध विभागांकडून विविध प्रकारची १६० कामांपैकी १२८ कामे पूर्ण झाली असून ३२ कामे अपूर्ण आहेत. सदरच्या कामांसाठी सुमारे ४ कोटी ७६ लाख ९९ हजार रुपये खर्च झाला आहे. या कामांमुळे जमिनीत पाणी मुरणार असून बंधार्‍यात, नाल्यात पाणी साचल्याने भविष्यात या १२ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होणार आहे.
जलयुक्त शिवार योजनेत शिवारात पडलेले पाणी गावात मुरावे, यासाठी भोर तालुक्यातील गृहिणी, महुडेबुद्रुक,पसुरे, कांबरे खे.बा., करंदी खे.बा., वागजवाडी, भोंगवली, ससेवाडी, मोरवाडी, पेंजळवाडी, शिंदेवाडी, वेळू या बारा गावांचा समावेश आहे. या गावात कृषी विभागाकडून सीसीटी, मजगी, बंधारे दुरुस्ती, गाळ काढणे, नाला खोलीकरण, सरळीकरण अशा एकूण १०२ कामांपैकी ७८ कामे पूर्ण झाली असून २४ कामे अपूर्ण आहेत. त्यासाठी एक कोटी २६ लाख ८४ हजार रुपयेखर्च झाला आहे, तर छोटे पाटबंधारे विभागार्तंगत कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, बांधणे गाळ काढणे, बंधार्‍यांची दुरुस्ती करणे, अशी ७ पैकी ६ कामे पूर्ण आहेत. एक काम अपूर्ण आहे. त्यासाठी ५४ लाख ६८ हजार रुपये खर्च झाला आहे. वन विभागाकडून एकूण ४५ पैकी ४१ कामे झाली असून ४ कामे अपूर्ण आहेत. २ कोटी १० लाख ६३ हजार रुपये खर्च झाला आहे.
पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून फक्त दोन कामे घेण्यात आली असून त्यासाठी ५० लाख ५२ हजार रुपये खर्च झाला आहे; मात्र दोन्ही कामे अपूर्ण आहेत. जलसंधारण स्थानिक स्तर अंतर्गत ४ पैकी एक अपूर्ण तर तीन कामे पूर्ण आहेत. ३४ लाख ६२ हजार खर्च झाला आहे, असा एकूण १६० कामांपैकी १२८ कामे पूर्ण तर ३२ कामे अपूर्ण असून सुमारे ४ कोटी ७६ लाख ९९ हजार रुपयेखर्च झाला आहे.
भोर तालुक्यात सर्वाधिक ४० कामांसाठी सुमारे एक कोटी ६ लाख ८९ हजार रुपये खर्च भांेगवली गावात झाला आहे. मात्र पेंजळवाडीत एकही काम झाले नसून एक रुपयाही खर्च झाला नाही. कृषी विभागाकडून सर्वाधिक १०२ कामे झाली असून सर्वांत कमी कामे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून २ कामे झाली आहेत.
चौकट
..तर पाणीटंचाई दूर होऊ शकते
जलयुक्त शिवार योजनेतील या बारा गावांत झालेल्या विविध प्रकारच्या कामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरले आहे. बंधार्‍यात पाणी साचले आहे. यामुळे दर उन्हाळ्यात होणार्‍या पाणीटंचाईवर मात करता येणार आहे; तर काही गावांत शेतीलाही या पाण्याचा उपयोग होणार आहे. सामाजिक वनीकरण व भूजल सर्व्हेक्षण विभागाकडून एकही हाती घेण्यात आले नाही, तर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून ग्रामीण भागातील गावात शिवकालीन साठवण विहीर, विहीर गाळ काढणे, पाईपलाईन दुरुस्ती ही कामे घेऊन दर उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर करता येऊ शकते. मात्र ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सावळा गोंधळ व उपअभियंता शाखा अभियंता यांच्या दुर्लक्षामुळे कामे हाती घेण्यात आली नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

कोट
ससेवाडी येथे चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेकडून लोकवर्गणी भरून नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे ३९ लाख ७२ हजार रुपयेमंजूर झाले आहे. तिचे काम अंतिम टप्प्यात आहे, तर तीन वर्षांपूर्वी वेळू गावासाठी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे २ कोटी ३६ लाख रुपये मंजूर आहे. त्यातील १० लाख ५० हजार रुपयांचे विहिरीचे काम झाले. ही दोन्ही कामे एक वर्षापूर्वी सुरू झालेल्या जलयुक्त शिवार अभियानात ग्रामीण पाणीपुरवठाविभागाकडून दाखविण्यात आली आहेत. म्हणजे केवळ काही तरी कामे दिसावीत म्हणून, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने खोटी कामे दाखवली आहेत. या कामांचा जलयुक्त शिवार योजनेशी काहीही संबंध नाही.
- धनाजी वाडकर, बाजार समिती संचालक

फोटो ओळ : जलयुक्त शिवार योजनेतील कामांमुळे वेळू येथे बंधार्‍यात साठलेले पाणी.