शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

विनाशासाठी मतस्वातंत्र्य नाही

By admin | Updated: March 21, 2016 03:42 IST

राज्यघटनेने विरोधी मत नोंदविण्याचा अधिकार दिलेला आहे, देशाचा विनाश करण्याचा नाही, असा सूर रविवारी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून उमटला.

नवी दिल्ली : राज्यघटनेने विरोधी मत नोंदविण्याचा अधिकार दिलेला आहे, देशाचा विनाश करण्याचा नाही, असा सूर रविवारी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून उमटला. राष्ट्रवाद व अभिव्यक्ती स्वातंत्र्य एकत्र नांदू शकतात, तर ‘भारत माता की जय’ म्हणणे हा चर्चेचा मुद्दा होऊ शकत नाही, अशी घोषणा देण्यात कुणालाही अडथळा वाटायला नको, असेही मत पक्षाने मांडले. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना ज्येष्ठ नेते अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, ‘पक्षाची आज अशी अवस्था झाली आहे की, निवडणुकीत काही करण्याची आपली महत्त्वाकांक्षा पक्ष हरवून बसला आहे.’ जेटलींनी दावा केला की, ‘पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकींत पक्षाची ताकद वाढेल. आसाममध्ये आमचे सरकार येईल, तर केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये राजकारणाची दिशा बदलेल. राज्यसभेत अल्पमतात असलेला भाजपा या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवून या परिस्थितीला बदलू पाहत आहे. कारण, वरच्या सभागृहात जीएसटीसह काही महत्त्वाची विधेयके अडकली आहेत. दरम्यान, उत्तराखंडमधील सरकारवर आलेल्या संकटाबाबत बोलताना ते म्हणाले की, याचा दोष भाजपावर देऊ नका. तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. या बैठकीतील प्रस्तावात असा दावा करण्यात आला आहे की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील आणि राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे एक प्रगतिशील सरकार आहे. पठाणकोट हल्ल्याबाबत भाष्य करताना म्हटले आहे की, अतिरेक्यांना संपवून जवानांनी यावर लक्ष केंद्रित केले की, कशा प्रकारे कमीतकमी नुकसान होईल. भारत-बांगलादेश भूमी करार आणि माजी सैनिकांच्या वन रँक वन पेन्शन कराराचा उल्लेखही यात सरकारच्या कौशल्याचा भाग म्हणून केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘विकास, विकास आणि विकास’ हेच आपल्या सरकारचे एकमेव उद्दिष्ट आहे. विरोधी पक्ष निरर्थक विषय पुढे आणून यावरून लक्ष हटवू पाहात आहेत. परंतु त्यांच्या या प्रयत्नांना बळी न पडता, भाजपा कार्यकर्त्यांनी केवळ सरकारच्या विकासाच्या अ‍ॅजेंड्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत केल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी नंतर पत्रकारांना सांगितले. पक्ष कार्यकर्त्यांनी खेडोपाडी जाऊन सरकारने केलेली भरीव कामगिरी लोकांपुढे मांडावी, असेही पंतप्रधानांनी सांगितल्याचे राजनाथ सिंग म्हणाले.अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आम्हीही पूर्ण समर्थन करतो. घटनेने विरोधी मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, विनाशाचा नव्हे. जेएनयूमध्ये राष्ट्रविरोधी घोषणा देण्यात आल्या, पण यासाठी अल्पसंख्याकांवर आरोप लावणे चुकीचे ठरेल. याचे नेतृत्व डाव्या विचारांच्या लोकांनी केले होते. - अरुण जेटली