शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

विनाशासाठी मतस्वातंत्र्य नाही

By admin | Updated: March 21, 2016 03:42 IST

राज्यघटनेने विरोधी मत नोंदविण्याचा अधिकार दिलेला आहे, देशाचा विनाश करण्याचा नाही, असा सूर रविवारी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून उमटला.

नवी दिल्ली : राज्यघटनेने विरोधी मत नोंदविण्याचा अधिकार दिलेला आहे, देशाचा विनाश करण्याचा नाही, असा सूर रविवारी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून उमटला. राष्ट्रवाद व अभिव्यक्ती स्वातंत्र्य एकत्र नांदू शकतात, तर ‘भारत माता की जय’ म्हणणे हा चर्चेचा मुद्दा होऊ शकत नाही, अशी घोषणा देण्यात कुणालाही अडथळा वाटायला नको, असेही मत पक्षाने मांडले. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना ज्येष्ठ नेते अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, ‘पक्षाची आज अशी अवस्था झाली आहे की, निवडणुकीत काही करण्याची आपली महत्त्वाकांक्षा पक्ष हरवून बसला आहे.’ जेटलींनी दावा केला की, ‘पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकींत पक्षाची ताकद वाढेल. आसाममध्ये आमचे सरकार येईल, तर केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये राजकारणाची दिशा बदलेल. राज्यसभेत अल्पमतात असलेला भाजपा या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवून या परिस्थितीला बदलू पाहत आहे. कारण, वरच्या सभागृहात जीएसटीसह काही महत्त्वाची विधेयके अडकली आहेत. दरम्यान, उत्तराखंडमधील सरकारवर आलेल्या संकटाबाबत बोलताना ते म्हणाले की, याचा दोष भाजपावर देऊ नका. तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. या बैठकीतील प्रस्तावात असा दावा करण्यात आला आहे की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील आणि राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे एक प्रगतिशील सरकार आहे. पठाणकोट हल्ल्याबाबत भाष्य करताना म्हटले आहे की, अतिरेक्यांना संपवून जवानांनी यावर लक्ष केंद्रित केले की, कशा प्रकारे कमीतकमी नुकसान होईल. भारत-बांगलादेश भूमी करार आणि माजी सैनिकांच्या वन रँक वन पेन्शन कराराचा उल्लेखही यात सरकारच्या कौशल्याचा भाग म्हणून केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘विकास, विकास आणि विकास’ हेच आपल्या सरकारचे एकमेव उद्दिष्ट आहे. विरोधी पक्ष निरर्थक विषय पुढे आणून यावरून लक्ष हटवू पाहात आहेत. परंतु त्यांच्या या प्रयत्नांना बळी न पडता, भाजपा कार्यकर्त्यांनी केवळ सरकारच्या विकासाच्या अ‍ॅजेंड्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत केल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी नंतर पत्रकारांना सांगितले. पक्ष कार्यकर्त्यांनी खेडोपाडी जाऊन सरकारने केलेली भरीव कामगिरी लोकांपुढे मांडावी, असेही पंतप्रधानांनी सांगितल्याचे राजनाथ सिंग म्हणाले.अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आम्हीही पूर्ण समर्थन करतो. घटनेने विरोधी मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, विनाशाचा नव्हे. जेएनयूमध्ये राष्ट्रविरोधी घोषणा देण्यात आल्या, पण यासाठी अल्पसंख्याकांवर आरोप लावणे चुकीचे ठरेल. याचे नेतृत्व डाव्या विचारांच्या लोकांनी केले होते. - अरुण जेटली