शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराच्या गुन्ह्यात तडजोडीला जागा नाही; सुप्रिम कोर्टाने सुनावले

By admin | Updated: July 2, 2015 01:45 IST

बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात कोणत्याही परिस्थितीत तडजोडीचा विचारही केला जाऊ शकत नाही आणि अशा प्रकरणांमध्ये न्यायालयांनी

नवी दिल्ली : बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात कोणत्याही परिस्थितीत तडजोडीचा विचारही केला जाऊ शकत नाही आणि अशा प्रकरणांमध्ये न्यायालयांनी मवाळ धोरण स्वीकारणे अथवा मध्यस्थीचा विचार करणेही पूर्णपणे बेकायदा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नि:संदिग्धपणे जाहीर केले.एका १५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याबद्दल सत्र न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा ठोठावलेल्या आरोपीने तिच्याशी विवाह करण्याची तयारी दर्शविल्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने अलीकडेच त्या आरोपीस मध्यस्थीने प्रकरण मिटविता यावे यासाठी जामीन मंजूर केला होता. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातून आलेल्या, तशाच प्रकारच्या एका अपिलाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. दिपक मिश्रा व न्या. प्रफुल्ल चंद्र पंत यांच्या खंडपीठाने वरीलप्रमाणे मत नोंदविले.न्यायालय म्हणते की, स्त्रिला तिचे चारित्र्य व शील हे सर्वोपरी असते. तिच्यासाठी शील सर्वाधिक पवित्र असते. त्यामुळे तिच्या शीलावर घाला घालणाऱ्या बलात्काऱ्याशी कोणतीही तडजोड करणे म्हणजे त्या पीडितेच्या शीलाचा सौदा करण्यासारखे आहे व ते कदापि केले जाऊ शकत नाही.न्यायालय म्हणाले की, स्त्रिच्या दृष्टीने तिचे शरीर एखाद्या मंदिरासारखे पवित्र असते. बलात्काराने या मंदिराचे पावित्र्य भंग पावते व स्त्रिचा जणू श्वासच घोटला जातो. चारित्र्य ही आयुष्यातील बहुमोल गोष्ट असून तो स्त्रिच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग असतो. मवाळ धोरण न स्वीकारण्याविषयी सर्व न्यायालयांना सावध करताना खंडपीठाने म्हटले की, काही वेळा बलात्कार करणारा पीडितेशी लग्न करायला तयार आहे, असे सांगून तडजोडीचा प्रस्ताव केला जातो. पण असे करणे म्हणजे चलाखीने दबाब आणणे आहे. न्यायालयांनी अशा कावेबाजीपासून कटाक्षाने दूर राहायला हवे. कारण बलात्काराच्या गुन्ह्यात मवाळपणा दाखविणे ही घोडचूक असते. मुळात तडजोडीचा प्रस्ताव केला जाणे आणि न्यायालयांनी त्याच्या भरीस पडणे हे असंवेदनशीलतेचे द्योतक आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)-मध्य प्रदेशातील या खटल्यात सत्र न्यायालयाने आरोपीस एका सात वर्षाच्या मुुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्याबद्दल सात वर्षांची शिक्षा ठोठावली होती. रानात गुरे चारायला गेलेल्या आईला शोधायला गेलेल्या या मुलीला नदीकाठी नेऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला होता. -अपिलात उच्च न्यायालयाने त्याच्यावरील बलात्काराचा गुन्हा रद्द करून त्यास फक्त विनयभंगाच्या आरोपावरून जेमतेम एक वर्षाची शिक्षा दिली होती. बलात्कारी व पीडित मुलीच्या आई-वडिलांमध्ये झालेल्या तडजोडीचा यासाठी आधार घेण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या चुकीवर वरीलप्रमाणे बोट ठेवून हे प्रकरण नव्याने सुनावणीसाठी पुन्हा खाली पाठविले.