शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षाच नाही

By admin | Updated: February 5, 2017 00:51 IST

राज्यातील भूमिकेबाबत मी समाधानी असून, पंतप्रधान बनण्याची माझी महत्त्वाकांक्षाच नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शनिवारी सांगितले.

लखनौ : राज्यातील भूमिकेबाबत मी समाधानी असून, पंतप्रधान बनण्याची माझी महत्त्वाकांक्षाच नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शनिवारी सांगितले. उत्तर प्रदेशातील माझ्या जबाबदारीबाबत मी समाधानी असून, देशाचा पंतप्रधान बनण्याची माझी महत्त्वाकांक्षा नाही, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. दिल्लीच्या बाहेर राहणारे लोक आनंदी असतात, असे त्यांनी गमतीत म्हटले. राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-सपा युतीला प्रचंड बहुमत मिळेल. ४०३ जागांपैकी ३०० जागा आम्ही जिंकू, असा दावा त्यांनी केला. सरकारी योजनांचा लाभ मिळालेल्या लोकांपैकी ५० टक्के लोकांनीही माझ्या सरकारच्या बाजूने मत दिले, तर आम्हाला ३०० जागा मिळतील, असे सांगून ते म्हणाले. या योजनांतील काहींची माहिती देताना ते म्हणाले की, ५५ लाख महिलांना समाजवादी निवृत्तीवेतन मिळत आहे. १८ लाख लॅपटॉप वितरित करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यानंतर प्रथमच वैद्यकीयच्या जागा दुप्पट करण्यात आल्या. याशिवाय १०८, १००, १०९ या हेल्पलाईन सेवा तसेच कन्या विद्याधन योजना. गरिबांसाठी अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत. वडील आणि सपाचे माजी प्रमुख मुलायमसिंह यादव यांना राजकीय लढाईत नामोहरम केल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, वडील आणि मुलगा या नात्यात कुठेही अंतर नाही. समाजवादी पार्टी आजही त्यांचीच आहे. सायकलही त्यांचीच आहे. नात्यात तसूभरही फरक पडलेला नसून, ते पूर्वीप्रमाणेत भक्कम आहे. वडील-मुलाचे नाते कोणीही बदलू शकणार नाही. समाजवादी पार्टीला इजा पोहोचवू पाहणाऱ्या लोकांपासून स्वत:ला दूर करण्यासाठी हे गरजेचे होते. ही बंडखोरी नाही. नेताजी पक्षात आम्हा सर्वांच्या वर आहेत. समाजवादी पार्टीला पुढे नेण्याची जबाबदारी आता पुढच्या पिढीवर आहे. तिकीटवाटपात तुमचा शब्द प्रमाण राहील, असे सांगितले गेल्यानंतरही तुम्ही मुलायमसिंह यांना पक्षाध्यक्षपदावरून का हटविले, असा प्रश्न केला असता मला केवळ १० आमदारांचा पाठिंबा मिळाला असता, तर ती माझी नाचक्की झाली असती. कुटुंबातील वादामागे कोण आहे या प्रश्नावर अखिलेख म्हणाले की, सपाचे ज्येष्ठ नेते आझम खान साहब यांनी सपात दुफळी कोणी निर्माण केली हे स्पष्टपणे सांगितले आहे. (वृत्तसंस्था)सपा जिंकल्यास नेताजींना आनंदच होईलमुलायमसिंह युतीसाठी प्रचार करतील काय या प्रश्नावर ते म्हणाले की, राज्यात सत्ता कायम राखणे हा आमचा एकमेव उद्देश आहे. त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. सपा जिंकल्यास सर्वाधिक आनंद नेताजींनाच होईल. सपाच्या दणदणीत यशामुळे नेताजींचाच आदर वाढणार आहे. आमच्या प्रचारमोहिमेत त्यांची छायाचित्रे आहेत. आमच्या प्रत्येक घोषवाक्यात त्यांचे नाव आहे. मी काँग्रेस-सपा युतीसाठी प्रचार करेन, असे नेताजींनी मला सांगितले आहे.