शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षाच नाही

By admin | Updated: February 5, 2017 00:51 IST

राज्यातील भूमिकेबाबत मी समाधानी असून, पंतप्रधान बनण्याची माझी महत्त्वाकांक्षाच नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शनिवारी सांगितले.

लखनौ : राज्यातील भूमिकेबाबत मी समाधानी असून, पंतप्रधान बनण्याची माझी महत्त्वाकांक्षाच नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शनिवारी सांगितले. उत्तर प्रदेशातील माझ्या जबाबदारीबाबत मी समाधानी असून, देशाचा पंतप्रधान बनण्याची माझी महत्त्वाकांक्षा नाही, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. दिल्लीच्या बाहेर राहणारे लोक आनंदी असतात, असे त्यांनी गमतीत म्हटले. राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-सपा युतीला प्रचंड बहुमत मिळेल. ४०३ जागांपैकी ३०० जागा आम्ही जिंकू, असा दावा त्यांनी केला. सरकारी योजनांचा लाभ मिळालेल्या लोकांपैकी ५० टक्के लोकांनीही माझ्या सरकारच्या बाजूने मत दिले, तर आम्हाला ३०० जागा मिळतील, असे सांगून ते म्हणाले. या योजनांतील काहींची माहिती देताना ते म्हणाले की, ५५ लाख महिलांना समाजवादी निवृत्तीवेतन मिळत आहे. १८ लाख लॅपटॉप वितरित करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यानंतर प्रथमच वैद्यकीयच्या जागा दुप्पट करण्यात आल्या. याशिवाय १०८, १००, १०९ या हेल्पलाईन सेवा तसेच कन्या विद्याधन योजना. गरिबांसाठी अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत. वडील आणि सपाचे माजी प्रमुख मुलायमसिंह यादव यांना राजकीय लढाईत नामोहरम केल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, वडील आणि मुलगा या नात्यात कुठेही अंतर नाही. समाजवादी पार्टी आजही त्यांचीच आहे. सायकलही त्यांचीच आहे. नात्यात तसूभरही फरक पडलेला नसून, ते पूर्वीप्रमाणेत भक्कम आहे. वडील-मुलाचे नाते कोणीही बदलू शकणार नाही. समाजवादी पार्टीला इजा पोहोचवू पाहणाऱ्या लोकांपासून स्वत:ला दूर करण्यासाठी हे गरजेचे होते. ही बंडखोरी नाही. नेताजी पक्षात आम्हा सर्वांच्या वर आहेत. समाजवादी पार्टीला पुढे नेण्याची जबाबदारी आता पुढच्या पिढीवर आहे. तिकीटवाटपात तुमचा शब्द प्रमाण राहील, असे सांगितले गेल्यानंतरही तुम्ही मुलायमसिंह यांना पक्षाध्यक्षपदावरून का हटविले, असा प्रश्न केला असता मला केवळ १० आमदारांचा पाठिंबा मिळाला असता, तर ती माझी नाचक्की झाली असती. कुटुंबातील वादामागे कोण आहे या प्रश्नावर अखिलेख म्हणाले की, सपाचे ज्येष्ठ नेते आझम खान साहब यांनी सपात दुफळी कोणी निर्माण केली हे स्पष्टपणे सांगितले आहे. (वृत्तसंस्था)सपा जिंकल्यास नेताजींना आनंदच होईलमुलायमसिंह युतीसाठी प्रचार करतील काय या प्रश्नावर ते म्हणाले की, राज्यात सत्ता कायम राखणे हा आमचा एकमेव उद्देश आहे. त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. सपा जिंकल्यास सर्वाधिक आनंद नेताजींनाच होईल. सपाच्या दणदणीत यशामुळे नेताजींचाच आदर वाढणार आहे. आमच्या प्रचारमोहिमेत त्यांची छायाचित्रे आहेत. आमच्या प्रत्येक घोषवाक्यात त्यांचे नाव आहे. मी काँग्रेस-सपा युतीसाठी प्रचार करेन, असे नेताजींनी मला सांगितले आहे.