शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

...तर रामभक्तांचा उद्रेक होईल-विनय कटियार

By admin | Updated: June 4, 2015 00:42 IST

अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे संघ परिवार आणि राम जन्मभूमी मंदिर आंदोलनाशी जुळलेले भारतीय जनता

जयशंकर गुप्त, नवी दिल्लीअयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे संघ परिवार आणि राम जन्मभूमी मंदिर आंदोलनाशी जुळलेले भारतीय जनता पक्षाचे नेते बयाणबाजी करून पक्ष व सरकारवर दबाव आणत आहेत, तर भाजप नेतृत्व अधिकृतपणे या मुद्यावर आपली वचनबद्धता जाहीर करतानाच यासाठी संसदेत दोन तृतीयांश बहुमताचे कारण पुढे करीत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अलीकडेच राम मंदिर निर्मितीसह पक्षाच्या पारंपरिक पण वादग्रस्त मुद्यांबाबत वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली होती. सोबतच त्यांच्या अंमलबजावणीसाठी लोकसभेत त्यांच्या पक्षाला दोन तृतीयांश बहुमत म्हणजेच ३७० जागा मिळणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. परंतु आता उत्तर प्रदेशातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य विनय कटियार यांनी भूसंपादनाप्रमाणेच अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्मितीसाठी वटहुकूम काढण्याची मागणी केली आहे. राम मंदिरासाठी रामभक्तांनी फार मोठे बलिदान दिले असून हा मुद्दा आता जास्त दिवस लांबणीवर टाकता येणार नाही, अन्यथा रामभक्तांच्या संतापाचा उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी बुधवारी लखनौत बोलताना दिला. कटियार म्हणाले की, मोदी सरकार या मुद्यावर सत्तेत आले नसले तरी भाजपच्या मतदारांसाठी तो देशाच्या विकासाएवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता सरकारने चर्चेतून अथवा कायद्याच्या माध्यमातून या मुद्यावर तोडगा काढला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सचिव व माध्यम विभागाचे प्रमुख श्रीकांत शर्मा यांनी कटियार यांच्या वक्तव्यावर कुठलीही टिपणी करण्यास नकार देताना सांगितले की, अयोध्येत भव्य राम मंदिर निर्मिती हा पक्षासाठी आस्था व वचनबद्धतेचा प्रश्न आहे.