शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

...तर रामभक्तांचा उद्रेक होईल-विनय कटियार

By admin | Updated: June 4, 2015 00:42 IST

अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे संघ परिवार आणि राम जन्मभूमी मंदिर आंदोलनाशी जुळलेले भारतीय जनता

जयशंकर गुप्त, नवी दिल्लीअयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे संघ परिवार आणि राम जन्मभूमी मंदिर आंदोलनाशी जुळलेले भारतीय जनता पक्षाचे नेते बयाणबाजी करून पक्ष व सरकारवर दबाव आणत आहेत, तर भाजप नेतृत्व अधिकृतपणे या मुद्यावर आपली वचनबद्धता जाहीर करतानाच यासाठी संसदेत दोन तृतीयांश बहुमताचे कारण पुढे करीत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अलीकडेच राम मंदिर निर्मितीसह पक्षाच्या पारंपरिक पण वादग्रस्त मुद्यांबाबत वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली होती. सोबतच त्यांच्या अंमलबजावणीसाठी लोकसभेत त्यांच्या पक्षाला दोन तृतीयांश बहुमत म्हणजेच ३७० जागा मिळणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. परंतु आता उत्तर प्रदेशातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य विनय कटियार यांनी भूसंपादनाप्रमाणेच अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्मितीसाठी वटहुकूम काढण्याची मागणी केली आहे. राम मंदिरासाठी रामभक्तांनी फार मोठे बलिदान दिले असून हा मुद्दा आता जास्त दिवस लांबणीवर टाकता येणार नाही, अन्यथा रामभक्तांच्या संतापाचा उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी बुधवारी लखनौत बोलताना दिला. कटियार म्हणाले की, मोदी सरकार या मुद्यावर सत्तेत आले नसले तरी भाजपच्या मतदारांसाठी तो देशाच्या विकासाएवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता सरकारने चर्चेतून अथवा कायद्याच्या माध्यमातून या मुद्यावर तोडगा काढला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सचिव व माध्यम विभागाचे प्रमुख श्रीकांत शर्मा यांनी कटियार यांच्या वक्तव्यावर कुठलीही टिपणी करण्यास नकार देताना सांगितले की, अयोध्येत भव्य राम मंदिर निर्मिती हा पक्षासाठी आस्था व वचनबद्धतेचा प्रश्न आहे.