शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

उद्धव ठाकरे यांची शहा-पवार यांच्यावर टीका

By admin | Updated: July 12, 2015 23:56 IST

कुणाला स्वबळाची तर कुणाला सरकार पाडण्याची खुमखुमी

कुणाला स्वबळाची तर कुणाला सरकार पाडण्याची खुमखुमी
-उद्धव ठाकरे यांचा शहा-पवारांना टोला
मुंबई: कुणाला स्वबळाची तर कुणाला सरकार पाडण्याची खुमखुमी आली आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.
मुंबईच्या नालेसफाईवरुन चिंता व्यक्त करणार्‍यांनी आधी तुंबलेल्या दिल्लीकडे लक्ष द्यावं. तिथं सत्ता कोणाची आहे ते आपल्याला माहित नाही, असे उपरोधिकपणे म्हणत ठाकरे म्हणाले की, मुंबईत एका दिवसात ३०० मि.मी. पाऊस होऊन पाणी तुंबले तर अनेकांना नालेसफाईची आठवण झाली. मात्र दिल्लीत केवळ १०० मि.मी. पाऊस होऊन दिल्ली तुंबली. दिल्लीत नाले आहेत की नाही ते मला माहित नाही. परंतु आता काहींना नालेसफाईची आठवण कशी झाली नाही, असा टोला उद्धव यांनी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना लगावला.
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात रविवारी महापालिका अधिकारी आणि गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांना उद्धव यांनी संबोधित केले. यावेळी पालिकेतील सर्व शिवसेना नगरसेवक, विभागप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला उत्सव आहे. त्याला विरोध करायला तो काही दाऊदचा उत्सव नाही. त्याला ब्रिटिशांनीही विरोध केला नाही. गणेशोत्सव भारतात नाही तर काय पाकिस्तानात साजरा होणार, हा मुर्दडांचा नाही तर जिवंत माणसांचा उत्सव आहे. तो दणक्यातच साजरा होणार, असा आदेश ठाकरे दिला.
कोणत्याही परिस्थित शिवसेना गणेशोत्सव मंडळांच्या पाठिशी उभी राहणार असल्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिली. मुंबईत बॉम्बस्फोट झाले. त्यातील आरोपींविरोधात अद्याप खटले सुरू आहेत. त्याविरोधात न्यायालयात जावे असे कोणाला वाटत नाही. पण, आपलेच लोक आपल्याच उत्सवांच्या विरोधात जातात. नमाजाच्या भोंग्याच्या विरोधात त्यांच्यातला कुणी न्यायालयात गेल्याचे दिसत नाही. मग आमच्याच उत्सवात विघ्न का आणता, असा उद्गीग्न सवाल करतानाच विघ्नांना घाबरू नका, शिवसेना पाठिशी आहे, असा विश्वास त्यांनी गणेशोत्सव मंडळांना दिला. (विशेष प्रतिनिधी)
.....................................................
कायद्यात दुरुस्ती करणार- मुख्यमंत्री
गणेशोत्सवासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा अभ्यास करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजय मेहता यांना दिले असून कायद्याची व्याप्ती वाढवण्यासंबंधी काही दुरुस्ती करण्याची गरज वाटली तर ते तशी शिफारस करणार आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. न्यायालयाचा सन्मान राखायचा परंतु उत्सव बंद करता येणार नाही याचेही भान राखायचे हे लक्षात घेऊन निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.