शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

राष्ट्रवादीसह स्वाभिमानी व जनसुराज्यची कसोटी

By admin | Updated: September 24, 2014 04:18 IST

निवडणूक विधानसभेची असली तरी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेससह स्वाभिमानी शेतकरी संघटना व जनसुराज्य शक्ती या पक्षाची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे

निवडणूक विधानसभेची असली तरी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेससह स्वाभिमानी शेतकरी संघटना व जनसुराज्य शक्ती या पक्षाची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. विधानसभेच्या १० जागांपैकी राष्ट्रवादीकडे तीन आहेत. कोल्हापूर हा एकेकाळी ‘राष्ट्रवादीचा गड’ मानला जाई. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पुणे जिल्ह्यातही जेवढी नव्हती तेवढी कोल्हापूरमध्ये या पक्षाची एकेकाळी ताकद होती. परंतु तो आता इतिहास झाला असून, आता लढवत असलेल्या तीन जागा राखण्याचे आव्हान या पक्षासमोर आहे. शरद पवार, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्यासह काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढविलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनाही लोकसभेतील यशाची विधानसभेत पुनरावृत्ती करायची आहे. लोक शेट्टी यांनाच विजयी करतात की त्यांच्या विचारांनाही बळ देतात, हे त्यावरून ठरणार आहे. १० वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात नवे काही घडवून आणण्याची शपथ घेऊन उतरलेल्या आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षासमोर तर अस्तित्वाचीच लढाई आहे.कोल्हापूर हा तसा राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक व संवदेनशील जिल्हा. उत्तम शेती, हिरवेगार उसाचे मळे, पांढऱ्या शुभ्र कणीदार दुधाचा महापूर, औद्योगिक नगरी आणि अलीकडील चार वर्षांत टोल आंदोलनामुळे राज्यातच नव्हे, तर देशात गाजत असलेला हा जिल्हा. इथला माणूस जेवढा स्वाभिमानी तेवढाच इरेबाज. त्याला कुणी आव्हान दिलेले आवडत नाही. मग तो भल्या भल्यांची उतरवतो. ही या जिल्ह्याच्या राजकारणाची प्रवृत्ती. त्यामुळेच आजपर्यंत या जिल्ह्यावर कुणा एका पक्षाचेच राज्य कधीच चालले नाही़ तसा मूळ काँग्रेसचा विचार मानणारा जिल्हा असला तरी तो जास्त करून विरोधकांचाच जिल्हा राहिला आहे. आताही दहापैकी निम्म्या जागा विरोधी पक्षांच्याच ताब्यात आहेत. त्यात काँग्रेस किंवा शिवसेनेची एखादी जागा वाढू शकते, परंतु त्यापेक्षा जास्त निकाल बदलण्याची चिन्हे आता तरी दिसत नाहीत. काँग्रेस ७ जागा लढवत आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील व सा. रे. पाटील हे विद्यमान आमदार आहेत. ९३ वर्षांचे सा. रे. पाटील पुन्हा नव्याने रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. गृहराज्यमंत्र्यांना पारंपरिक विरोधक आमदार महादेवराव महाडिक गटाशी झुंज द्यावी लागण्याची चिन्हे आहेत. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांची लढत शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी होत आहे. विलासराव देशमुख यांच्या पुण्याईमुळे लातूरला जावून १५ दिवसांत खासदार झालेले जयवंतराव आवळे पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. राष्ट्रवादी तीन जागा लढवत आहे. जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांना कागल मतदारसंघात शिवसेनेच्या संजय घाटगे यांनी आव्हान दिले आहे. तिथे घाटगे हे माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांना सोबत व शिवसेनेचा झेंडा घेऊन मैदानात उतरल्याने लढतीत रंग भरला आहे. जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील यांचे भवितव्य विरोधात किती उमेदवार राहतात यावर ठरणार आहे. चंदगडला आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या घरातच संघर्ष आहे.