शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

इराण-सौदीदरम्यानचा तणाव चिघळला

By admin | Updated: January 5, 2016 00:33 IST

शिया धर्मगुरूला मृत्युदंड देण्यात आल्याने सौदी अरब आणि इराणदरम्यानचा तणाव विकोपाला पोहोचला असून सौदी अरब आणि मित्र देशांनी इराणसोबतचे संबंध तोडले आहेत.

रियाध : शिया धर्मगुरूला मृत्युदंड देण्यात आल्याने सौदी अरब आणि इराणदरम्यानचा तणाव विकोपाला पोहोचला असून सौदी अरब आणि मित्र देशांनी इराणसोबतचे संबंध तोडले आहेत. शनिवारपासून या दोन्ही देशांत शाब्दिक खडांजगीला सुरुवात झाली. सौदी अरबसोबत बहरीन आणि सुदाननेही आखात आणि अरब देशांमधील तेहरानच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे तेहरानसोबतचे संबंध तोडले आहेत.तेहारानमधील सौदीच्या दूतावास जाळण्यात आल्याच्या प्रकाराने संतापलेल्या सौदीने रविवारी उशिरा इराणसोबतचे संबंध तोडत इराणच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना ४८ तासांच्या आत सौदी अरब सोडण्याचे फर्मान जारी केले. सोबतच इराणसोबतचा सर्व हवाई संपर्क तोडला आहे. सौदी अरबमधील सर्व विमान कंपन्यांना इराणकडे आणि इराणहून सौदीत येणाऱ्या विमानांची उड्डाणे रद्द आणि रोखण्यास सांगण्यात आले आहे. बहरीन आणि सुदाननेही सोमवारी सौदीच्या पावलांवर पाऊल ठेवीत इराणशी संबंध तोडून टाकले. दरम्यान, सौदी अरब आणि इराण यांच्यातील पेच सोडविण्यासाठी रशियाने मध्यस्थी करण्याची तयारी दाखविली आहे. सिरिया, येमेनसह मध्यपूर्वेतील (नैर्ऋत्य आशिया) संघर्षावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सौदी आणि इराणदरम्यान निर्माण झालेल्या पेचामुळे फसण्याची भीती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि अन्य पाश्चात्त्य देशांनी या दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले आहे. संयुक्त अरब अमिरातनेही राजदूत माघारी बोलावला आहे. अंतर्गत कारभारात तेहरान सातत्याने ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप सौदी अरबने केला आहे. अरबच्या बाबतीत इराणचा असाच आजवरचा इतिहास राहिला आहे, असे सौदीचे विदेशमंत्री आदेल अल-जुबेर यांनी म्हटले आहे. राजनैतिक अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांसह ८० सौदी नागरिकांनी इराण सोडले असून ते सोमवारी दुबईत दाखल झाले. सौदीच्या रणनीतीमुळे विभागीय तणाव चिघळेल, असे इराणने म्हटले आहे. इराणचा सौदीवर आरोपसंबंध संपुष्टात आणण्याच्या सौदीच्या निर्णयामुळे त्याने शिया मौलवींची हत्या करून केलेल्या घोडचुकीपासून जगाचे लक्ष विचलित होणार नाही, असे इराणने म्हटले. मौलवींना मृत्युदंड देण्याच्या सौदीच्या निर्णयामुळे प्रदेशात अस्थिरता निर्माण होऊन दहशतवादाला चालना मिळेल, असेही इराणने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)> सौदी अरेबियात शिया मौलवी शेख निम्र अल निम्र्र यांच्यासह ४६ जणांना मृत्युदंड देण्यात आला. या घटनेने प्रदेशातील धार्मिक फूट पुन्हा उघड झाली आहे. बहरीनपासून पाकिस्तानपर्यंत हजारो शिया निदर्शक रस्त्यावर उतरले, तर सुन्नी राजवट असलेले देश सौदीच्या समर्थनार्थ पुढे आले. हा घटनाक्रम नवे राजे सलमान यांच्या नेतृत्वाखाली सौदी अरेबियाने आक्रमकता अंगीकारल्याचे अधोरेखित करतो. राजे सलमान यांच्या नेतृत्वाखालील सौदीने येमेनमधील शिया हुती बंडखोरांविरुद्धच्या आघाडीचे नेतृत्व केले, तसेच इराणने जागतिक सत्तांसोबत अणुकरार करूनही त्याचा तीव्र विरोध केला.