शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

ग्रामपंचायतींचा पदभार घेण्यास तांत्रिक अडचण शासन अधिसूचनेची प्रतीक्षा : तहसीलदारांचा नकार

By admin | Updated: March 24, 2015 23:46 IST

नाशिक : जिल्‘ातील सात ग्रामपंचायतींचे नगर परिषद, नगर पंचायतीत रूपांतर करून सदस्यांची निवडप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या ग्रामपंचायतींवर तहसीलदारांना प्रशासक म्हणून नेमण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने यासंदर्भातील आदेश निघू शकलेले नाहीत. ग्रामपंचायती बरखास्त झाल्याचा आदेशच नसल्याने प्रशासक म्हणून पदभार कसा स्वीकारावा, असा प्रश्न तहसीलदारांना पडला आहे.

नाशिक : जिल्‘ातील सात ग्रामपंचायतींचे नगर परिषद, नगर पंचायतीत रूपांतर करून सदस्यांची निवडप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या ग्रामपंचायतींवर तहसीलदारांना प्रशासक म्हणून नेमण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने यासंदर्भातील आदेश निघू शकलेले नाहीत. ग्रामपंचायती बरखास्त झाल्याचा आदेशच नसल्याने प्रशासक म्हणून पदभार कसा स्वीकारावा, असा प्रश्न तहसीलदारांना पडला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने यासंदर्भात १२ मार्च रोजी शासन परिपत्रक काढून महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिकनगरी अधिनियम १९६५ मधील कलम ३४० (२) (१) मधील तरतुदीनुसार स्थापित होऊ पाहणार्‍या नगर परिषदा, नगर पंचायतीची रचना होईपर्यंत संबंधित सर्व अधिकार व कर्तव्य पार पाडण्यासाठी तहसीलदारांना प्रशासक म्हणून नेमण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्‘ातील चांदवड, निफाड, पेठ, सुरगाणा, कळवण, देवळा व दिंडोरी या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून त्या त्या तालुक्याच्या तहसीलदारांनी सूत्रे स्वीकारावीत, असेही नमूद करण्यात आल्याने सदरच्या ग्रामपंचायती बरखास्त झाल्याचा अर्थ त्यातून काढण्यात आला आहे. परंतु शासनाने परिपत्रक काढून ज्या कायद्यान्वये नवीन नगर परिषदा अस्तित्वात आणू पाहात आहेत, त्याची अधिसूचनाच अद्याप निघालेली नाही, त्यामुळे निव्वळ शासन परिपत्रकान्वये ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीची कार्यवाही बेकायदेशीर ठरण्याची शक्यता शासकीय पातळीवर व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाची अधिसूचना व ग्रामपंचायती बरखास्त झाल्याशिवाय तहसीलदारांची नेमणूक करण्याचा विचारही मागे पडला आहे. दरम्यान, जिल्‘ातील या सातही ग्रामपंचायतींचा मार्च महिना आर्थिक वर्षाचा असतानाच शासनाचे प्रशासकीय नियुक्तीचे आदेश आल्यामुळे त्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला असून, ग्रामपंचायतींचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यातही त्यामुळे अडचणी निर्माण झाल्याची बाब निफाडचे राजाभाऊ शेलार यांनी उपजिल्हाधिकारी (प्रशासन) नीलेश जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली; परंतु यासंदर्भात शासनाचे आदेश आल्याशिवाय काहीच करता येणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. याच दरम्यान, जिल्‘ातील तहसीलदारांनीही ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून जाण्यास नकार दिला असून, अगोदरच अन्य कामांचा ताण असताना नव्याने जबाबदारी नको, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्याचबरोबर तहसीलदारपदाची आब अबाधित ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीचा पदभार नको, असे त्यांनी शासनाला कळविले आहे.