शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

ग्रामपंचायतींचा पदभार घेण्यास तांत्रिक अडचण शासन अधिसूचनेची प्रतीक्षा : तहसीलदारांचा नकार

By admin | Updated: March 24, 2015 23:46 IST

नाशिक : जिल्‘ातील सात ग्रामपंचायतींचे नगर परिषद, नगर पंचायतीत रूपांतर करून सदस्यांची निवडप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या ग्रामपंचायतींवर तहसीलदारांना प्रशासक म्हणून नेमण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने यासंदर्भातील आदेश निघू शकलेले नाहीत. ग्रामपंचायती बरखास्त झाल्याचा आदेशच नसल्याने प्रशासक म्हणून पदभार कसा स्वीकारावा, असा प्रश्न तहसीलदारांना पडला आहे.

नाशिक : जिल्‘ातील सात ग्रामपंचायतींचे नगर परिषद, नगर पंचायतीत रूपांतर करून सदस्यांची निवडप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या ग्रामपंचायतींवर तहसीलदारांना प्रशासक म्हणून नेमण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने यासंदर्भातील आदेश निघू शकलेले नाहीत. ग्रामपंचायती बरखास्त झाल्याचा आदेशच नसल्याने प्रशासक म्हणून पदभार कसा स्वीकारावा, असा प्रश्न तहसीलदारांना पडला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने यासंदर्भात १२ मार्च रोजी शासन परिपत्रक काढून महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिकनगरी अधिनियम १९६५ मधील कलम ३४० (२) (१) मधील तरतुदीनुसार स्थापित होऊ पाहणार्‍या नगर परिषदा, नगर पंचायतीची रचना होईपर्यंत संबंधित सर्व अधिकार व कर्तव्य पार पाडण्यासाठी तहसीलदारांना प्रशासक म्हणून नेमण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्‘ातील चांदवड, निफाड, पेठ, सुरगाणा, कळवण, देवळा व दिंडोरी या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून त्या त्या तालुक्याच्या तहसीलदारांनी सूत्रे स्वीकारावीत, असेही नमूद करण्यात आल्याने सदरच्या ग्रामपंचायती बरखास्त झाल्याचा अर्थ त्यातून काढण्यात आला आहे. परंतु शासनाने परिपत्रक काढून ज्या कायद्यान्वये नवीन नगर परिषदा अस्तित्वात आणू पाहात आहेत, त्याची अधिसूचनाच अद्याप निघालेली नाही, त्यामुळे निव्वळ शासन परिपत्रकान्वये ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीची कार्यवाही बेकायदेशीर ठरण्याची शक्यता शासकीय पातळीवर व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाची अधिसूचना व ग्रामपंचायती बरखास्त झाल्याशिवाय तहसीलदारांची नेमणूक करण्याचा विचारही मागे पडला आहे. दरम्यान, जिल्‘ातील या सातही ग्रामपंचायतींचा मार्च महिना आर्थिक वर्षाचा असतानाच शासनाचे प्रशासकीय नियुक्तीचे आदेश आल्यामुळे त्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला असून, ग्रामपंचायतींचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यातही त्यामुळे अडचणी निर्माण झाल्याची बाब निफाडचे राजाभाऊ शेलार यांनी उपजिल्हाधिकारी (प्रशासन) नीलेश जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली; परंतु यासंदर्भात शासनाचे आदेश आल्याशिवाय काहीच करता येणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. याच दरम्यान, जिल्‘ातील तहसीलदारांनीही ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून जाण्यास नकार दिला असून, अगोदरच अन्य कामांचा ताण असताना नव्याने जबाबदारी नको, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्याचबरोबर तहसीलदारपदाची आब अबाधित ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीचा पदभार नको, असे त्यांनी शासनाला कळविले आहे.