शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

आसाममध्ये तरुण गोगोई, की सर्बानंद सोनोवाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2016 03:52 IST

पूर्वोत्तरचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आसाममध्ये विधानसभेच्या १२६ जागांसाठी निवडणुका होत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई सध्या येथे मुख्यमंत्री आहेत.

पूर्वोत्तरचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आसाममध्ये विधानसभेच्या १२६ जागांसाठी निवडणुका होत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई सध्या येथे मुख्यमंत्री आहेत. उत्तम प्रशासक आणि मुत्सद्दी राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. १७ मे २००१ रोजी त्यांनी आसामच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिले नाही. गत निवडणुकीत तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसने या राज्यात निवडणूक लढविली आणि घवघवीत यशही मिळविले. २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ७८ जागांवर विजय मिळविला होता, तर राज्यातील एक प्रमुख पक्ष असलेल्या आसाम गण परिषदेला १० जागा मिळाल्या होत्या. भाजपला फक्त ५ जागांवर समाधान मानावे लागले होते. आसाम युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटने (एयूडीएफ) ७५ मतदारसंघांत उमेदवार उभे केले होते. त्यांना १८ जागांवर विजय मिळाला, तर बोडोलँड पीपल्स पार्टीने १५ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी राहुल गांधी यांनी आसाममध्ये प्रचार करत युवा ब्रिगेडच्या ७ जणांना उमेदवारी दिली होती. यातील ६ जण निवडून आले होते. सर्वसामान्य जनतेसाठी राबविलेल्या कल्याणकारी योजना हाच गोगोई यांच्या विजयाचा भक्कम आधार होता. शालेय मुलांना दुपारचे भोजन, ९२ हजार विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर व लॅपटॉप दिले. एक लाखांपेक्षा अधिक शालेय विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप. अशा अनेक योजना राबविल्यामुळे काँग्रेसने मागील निवडणुकीत यश खेचून आणले. आसाम गण परिषदेबाबत स्थानिक नागरिकांना आकर्षण होते. आसामच्या मतदारांनी त्यांना सत्ताही दिली होती; पण या पक्षाला सत्तेचे सोने करता आले नाही.भाजपने दिला नवा चेहराकोणत्याही राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजप मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा करीत नाही; पण आसाममध्ये भाजपने केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल (५३) यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केले आहे. सर्बानंद सोनोवाल यांनी २०११ मध्ये आगपमधून भाजपत प्रवेश केला होता. विद्यार्थीदशेपासूनच सोनोवाल हे राजकारणाशी जोडले गेलेले आहेत. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच सोनोवाल यांच्याकडे चार महिन्यांपूर्वी आसाम भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली होती. दरम्यान, आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ) यांनी भाजपसोबत युती केली आहे. याचा फायदा भाजपला होऊ शकतो. काँग्रेसचा जुनाच उमेदवार अनेक वर्षांपासून आसाममध्ये आपला करिश्मा सिद्ध करणारे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्यापुढे यंदा भाजपचे आव्हान आहे. काँग्रेसमधून राहुल गांधी हे रणनीती आखत आहेत. आॅल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटचे बदरुद्दीन अजमल हेही एक प्रमुख नेते आहेत. प्रसंगी काँग्रेस या डेमोकॅ्रटिक फ्रंटचे समर्थन घेऊ शकते. बाहेरील नागरिकांची घुसखोरी, जातीय हिंसाचार, वीज, पाणी, रस्ते यांची समस्या हे प्रश्न प्रचारात चर्चिले जात आहेत. एकूणच काय तर तरुण गोगोई आणि सर्बानंद सोनोवाल यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी ही लढत आहे, तर काँग्रेस आणि भाजपसाठी हे निकाल त्यांच्या आगामी राजकारणाला नवे परिमाण देणारे ठरणार आहेत.एकूण जागा : १२६पहिल्या टप्प्यात मतदान : ४ एप्रिल रोजी ६५ जागांवर दुसरा टप्पा : ११ एप्रिल रोजी ६१ जागांवर मतमोजणी : १९ मे मतदार : १ कोटी ९२ लाख बहुमतासाठी ६४ जागा आवश्यक २०११ चे पक्षीय बलाबल काँग्रेस : ७८आॅल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंट : १८ बोडोलँड पीपल्स पार्टी : १५ आसाम गण परिषद : १० भाजप : ५