शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

राजीव गांधींच्या मारेक-यांना सोडण्यासाठी तामिळनाडू सरकारची तयारी

By admin | Updated: March 3, 2016 13:44 IST

राजीव गांधी हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या सातही मारेक-यांनी 20 वर्षाहून जास्त काळ कारागृहात शिक्षा भोगली आहे त्यामुळे त्यांना सोडण्याचा विचार तामिळनाडू सरकार करत आहे

ऑनलाइन लोकमत 
चेन्नई, दि. ३ - तामिळनाडू सरकारने राजीव गांधींच्या मारेक-यांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राजीव गांधी हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या सातही मारेक-यांनी 20 वर्षाहून जास्त काळ कारागृहात शिक्षा भोगली आहे त्यामुळे त्यांना सोडण्याचा विचार तामिळनाडू सरकार करत आहे. तामिळनाडू सरकारने याप्रकरणी केंद्राचं मत मागितल आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला होता त्यामुळे तामिळनाडू सरकारने केंद्राकडे विचारणा केली आहे. 
 
केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी यांनी तामिळनाडूचे मुख्य सचिव के. ज्ञानदेसीकन यांना यासंबंधी पत्र पाठवलं आहे. सातही आरोपींनी केलेल्या याचिकेवर तामिळनाडू सरकार विचार करत असून त्यांची जन्मठेपेची शिक्षा माफ करण्याचा विचार सरकार करत आहे. सर्व दोषींनी 24 वर्ष कारागृहात आपली शिक्षा भोगली आहे त्यामुळे त्यांना मुक्त करण्याचा सरकार विचार करत असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. 
 
काँग्रेसने नोंदवली नाराजी
दरम्यान तामिळनाडू सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसने नाराजी नोंदवली आहे. याप्रकरणी केंद्र सरकारने निर्णय घेतला पाहिजे, असे मत काँग्रेस उपाध्यक्ष नोंदवले आहे. तर या निर्णयापेक्षा अधिक वाईट गोष्ट असूच शकत नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केली.  तामिळनाडू सरकारच्या पत्राला केंद्राने महत्व देण्याची गरज नाही, मारेक-यांना सोडण्यात येऊ नये अशी मागणीही त्यांनी लोकसभेत केली.
 
राजीव गांधींच्या हत्येप्रकरणी संथान, मुरुगन, पेरारीवलन, नलिनी, रॉबर्ट पायस, जयकुमार आणि रविचंद्रन हे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. दरम्यान गेल्या आठवड्यात या हत्याप्रकरणातील दोषी नलिनी श्रीहरन हिला वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी तुरुंग प्रशासनाने एका दिवसासाठी पॅरोलदेखील मंजूर केला होता. 
 
महत्वाचं म्हणजे तामिळनाडू सरकारने याआधीही राजीव गांधींच्या मारेक-यांना सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यास नकार दिला होता. राजीव गांधी यांचे मारेकरी मुरुगन, संथान आणि अरिवू यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत परावर्तित करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर तमिळनाडू सरकारने या तिघांची सुटका करण्याचा निर्णय घेतला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकारच्या या निर्णयाला स्थगिती दिली, तर केंद्र सरकारने तमिळनाडू सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मारेकऱ्यांची सुटका करण्यास नकार देत तो अधिकार केंद्र सरकारकडे असल्याचे स्पष्ट केले होते.