शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

पराभवाची जबाबदारी घ्या - भाजपातल्या तरूण तुर्कांवर म्हाता-या अर्कांचा हल्ला

By admin | Updated: November 10, 2015 20:33 IST

बिहारमधल्या दारूण पराभवासाठी या निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनाच जबाबदार धरा असे सांगत आडवाणी, जोशी आदी ज्येष्ठांनी मोदी-शाह आदींवर निशाणा साधला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - बिहारमधल्या दारूण पराभवासाठी या निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनाच जबाबदार धरा असे सांगत आडवाणी, जोशी आदी ज्येष्ठांनी मोदी-शाह आदींवर निशाणा साधला आहे.  भाजपा दिल्लीतल्या पराभवानंतर काहीच शिकली नसल्याचे खापरही भाजपातल्या बाजुला टाकल्या गेलेल्या ज्येष्ठांनी नव्या नेत्यांवर फोडले आहे.
लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, शांताकुमार आणि यशवंत सिन्हा यांनी बिहारमधल्या पराभवासाठी कुणालाच जबाबदार न धरल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे, तसेच तटस्थ समिती नेमून पराभवासाठी कोण जबाबदार आहे याचा शोध घ्यायला पाहिजे असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
पराभवासाठी ठराविक असं कोणी जबाबदार नसून ती सगळ्यांचीच जबाबजारी असल्याची भूमिका स्वीकारण्यासारखी नाही अशा कानपिचक्याही या पत्रात देण्यात आल्या आहेत. केवळ एकपानी हे पत्र असले तरी त्यामध्ये सध्या ज्यांच्या हातात पक्षाती सगळी सूत्रे एकवटली आहेत, त्या अमित शाह व नरेंद्र मोदींना योग्य तो संदेश जाईल याची व्यवस्थित काळजी यामध्ये घेण्यात आली आहे.
या चारही नेत्यांना गेल्या वर्षभरात भारतीय जनता पार्टीच्या कामकाजापासून लांब ठेवले गेले आहे. मार्गदर्शक मंडळामध्ये समावेश असलेल्या या ज्येष्ठांनी आज एकत्र येत बिहारच्या पराभवाची मीमांसा केली आणि काही मूठभर नेत्यांनी निवडणुकीची धुरा वाहिली आणि त्यांना जबाबदार धरले पाहिजे अशी मागणी केली.
या धुरीणांनी कुणाचे नाव नमूद केले नसले तरी त्यांचा रोख मोदी व शाह यांच्यावर असल्याचे जाणवत आहे. भाजपामध्ये बिहार निवडणुकांवरून विद्यमान व माजी अशी फूट पडल्याचे यानिमित्ताने दिसत आहे.