शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

डाळीच्या दरावर नियंत्रण आणा - शत्रुघ्न सिन्हांचा मोदी सरकारला घरचा आहेर

By admin | Updated: October 16, 2015 14:08 IST

डाळीचे दर २०० रुपयांपर्यंत पोहोचले असून केंद्र सरकारने यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे अशा शब्दात अभिनेते आणि भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. १६ - डाळीचे दर २०० रुपयांपर्यंत पोहोचले असून केंद्र सरकारने यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे अशा शब्दात अभिनेते आणि भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. यापूर्वी कांद्याने सर्वांच्या कसे रडवले होते हे विसरु नका असेही त्यांनी म्हटले आहे. 

पक्षविरोधी विधान भाजपाला अडचणीत आणणारे बिहारमधील भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारने डाळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत असे त्यांनी म्हटले आहे. तसेच बिहारला विकासाच्या वाटेवर नेणा-या पक्षाचाच विजय व्हावा असे सूचक ट्विटही त्यांनी केले. सध्याच्या सणासुदीच्या काळात वाईटावर चांगला प्रवृत्तीचा, खोट्या गोष्टीवर सत्याचा आणि अहंकारावर माणुसकीचा विजय व्हावा असेही त्यांनी नमूद केले आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच शत्रुघ्न सिन्हा यांनी नितीशकुमार यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. तसेच भाजपाच्या प्रचारातही शत्रुघ्न सिन्हा फारसे सक्रीय नव्हते. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांनी डाळ बॉम्बने मोदींवर निशाणा साधल्याची चर्चा बिहारमधील राजकीय वर्तुळात रंगली आहे.