शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

डाळीच्या दरावर नियंत्रण आणा - शत्रुघ्न सिन्हांचा मोदी सरकारला घरचा आहेर

By admin | Updated: October 16, 2015 14:08 IST

डाळीचे दर २०० रुपयांपर्यंत पोहोचले असून केंद्र सरकारने यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे अशा शब्दात अभिनेते आणि भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. १६ - डाळीचे दर २०० रुपयांपर्यंत पोहोचले असून केंद्र सरकारने यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे अशा शब्दात अभिनेते आणि भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. यापूर्वी कांद्याने सर्वांच्या कसे रडवले होते हे विसरु नका असेही त्यांनी म्हटले आहे. 

पक्षविरोधी विधान भाजपाला अडचणीत आणणारे बिहारमधील भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारने डाळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत असे त्यांनी म्हटले आहे. तसेच बिहारला विकासाच्या वाटेवर नेणा-या पक्षाचाच विजय व्हावा असे सूचक ट्विटही त्यांनी केले. सध्याच्या सणासुदीच्या काळात वाईटावर चांगला प्रवृत्तीचा, खोट्या गोष्टीवर सत्याचा आणि अहंकारावर माणुसकीचा विजय व्हावा असेही त्यांनी नमूद केले आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच शत्रुघ्न सिन्हा यांनी नितीशकुमार यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. तसेच भाजपाच्या प्रचारातही शत्रुघ्न सिन्हा फारसे सक्रीय नव्हते. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांनी डाळ बॉम्बने मोदींवर निशाणा साधल्याची चर्चा बिहारमधील राजकीय वर्तुळात रंगली आहे.