शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

‘इस्रो’ घेणार स्वदेशी ‘स्पेस शटल’ची भरारी!

By admin | Updated: May 16, 2016 04:45 IST

उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी पुन्हा वापरता येणारे पूर्णपणे देशी बनावटीचे पहिले अंतराळ यान (स्पेस शटल) विकसित करण्याची तयारी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) करीत आहे.

तिरुवनंतपुरम : उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी पुन्हा वापरता येणारे पूर्णपणे देशी बनावटीचे पहिले अंतराळ यान (स्पेस शटल) विकसित करण्याची तयारी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) करीत आहे. विमानासारखे पंख असलेले ‘आरएलव्ही-टीडी’ हे ‘इस्रो’चे पुनर्वापरयोग्य यान अंतराळात झेपावेल तेव्हा देशाने नवा इतिहास रचलेला असेल. ‘चांद्रयान’ मोहीम फत्ते करून जगाचे लक्ष वेधणाऱ्या आणि मोजक्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसणाऱ्या इस्रोच्या शीरपेचात त्यामुळे मानाचे आणखी एक पीस रोवले जाईल.आकार व वजनाने ‘एसयूव्ही’ मोटारीएवढे असलेल्या या भारतीय ‘स्पेस शटल’ला पहिल्या अंतराळ सफरीवर रवाना करण्याची मोहीम अंतिम टप्प्यात आहे. याआधी अंतराळ तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या अमेरिकेसह इतरही काही देशांनी उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी व अंतराळ सफरींसाठी अशा ‘स्पेस शटल’चा वापर केला. मात्र कालांतराने अपघात व न परवडणाऱ्या आर्थिक गणितामुळे त्यांनी ही कल्पना सोडून दिली किंवा अशा वाहनांचा वापर बंद केला. भारताच्या अभियंत्यांनी काटकसरीवर भर देत रॉकेटच्या पुनर्वापरावर भर दिला आहे. पुनर्वापर तंत्रज्ञान यशस्वी झाल्यास अंतराळ प्रक्षेपणावरील खर्च १० पटींनी कमी होऊन प्रति किलो २ हजार डॉलरवर आणला जाऊ शकतो, असे इस्रोच्या वैज्ञानिकांना वाटते.यान बंगालच्या खाडीत परतणार...बंगालच्या खाडीला लागून असलेल्या आंध्र प्रदेशच्या प्रक्षेपण तळावरून आरएलव्ही-टीडीचे प्रक्षेपण केले जाईल. इस्रोचे डेल्टा पंख लावलेले हे यान बंगालच्या खाडीत परतेल. >भारत पाचवा देश ठरणार... अमेरिका, फ्रान्स, रशिया आणि जपाननंतर संचालित स्पेस शटल पाठविणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होेणार आहे. अमेरिकेने स्पेस शटल १३५ वेळा अंतराळात पाठविण्याचा मान पटकावला. २०११मध्ये त्याचे आयुष्य संपुष्टात आले. या यानाची अंतराळयात्री अवकाशात पाठविण्याची क्षमता संपुष्टात आली आहे. रशियाचे स्पेस शटल १९८९मध्ये पहिल्यांदा अंतराळात गेले होते. फ्रान्स आणि जपाननेही काही प्रायोगिक उड्डाणे पार पाडली. चीनला मात्र हा प्रयत्न करता आला नाही.>हनुमानउडी घेण्याच्या दिशेने टाकलेले हे छोटे पाऊल आहे. अंतिम ढाचा तयार करण्यासाठी किमान १० ते १५ वर्षे लागतील, कारण मानवासह अवकाशात जाणाऱ्या पुनर्वापरायोग्य यानाचे डिझाईन तयार करणे हा पोरखेळ नाही.- के. सिवान, संचालक, विक्रम साराभाई अंतराळ केंद्र