शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘इस्रो’ घेणार स्वदेशी ‘स्पेस शटल’ची भरारी!

By admin | Updated: May 16, 2016 04:45 IST

उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी पुन्हा वापरता येणारे पूर्णपणे देशी बनावटीचे पहिले अंतराळ यान (स्पेस शटल) विकसित करण्याची तयारी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) करीत आहे.

तिरुवनंतपुरम : उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी पुन्हा वापरता येणारे पूर्णपणे देशी बनावटीचे पहिले अंतराळ यान (स्पेस शटल) विकसित करण्याची तयारी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) करीत आहे. विमानासारखे पंख असलेले ‘आरएलव्ही-टीडी’ हे ‘इस्रो’चे पुनर्वापरयोग्य यान अंतराळात झेपावेल तेव्हा देशाने नवा इतिहास रचलेला असेल. ‘चांद्रयान’ मोहीम फत्ते करून जगाचे लक्ष वेधणाऱ्या आणि मोजक्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसणाऱ्या इस्रोच्या शीरपेचात त्यामुळे मानाचे आणखी एक पीस रोवले जाईल.आकार व वजनाने ‘एसयूव्ही’ मोटारीएवढे असलेल्या या भारतीय ‘स्पेस शटल’ला पहिल्या अंतराळ सफरीवर रवाना करण्याची मोहीम अंतिम टप्प्यात आहे. याआधी अंतराळ तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या अमेरिकेसह इतरही काही देशांनी उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी व अंतराळ सफरींसाठी अशा ‘स्पेस शटल’चा वापर केला. मात्र कालांतराने अपघात व न परवडणाऱ्या आर्थिक गणितामुळे त्यांनी ही कल्पना सोडून दिली किंवा अशा वाहनांचा वापर बंद केला. भारताच्या अभियंत्यांनी काटकसरीवर भर देत रॉकेटच्या पुनर्वापरावर भर दिला आहे. पुनर्वापर तंत्रज्ञान यशस्वी झाल्यास अंतराळ प्रक्षेपणावरील खर्च १० पटींनी कमी होऊन प्रति किलो २ हजार डॉलरवर आणला जाऊ शकतो, असे इस्रोच्या वैज्ञानिकांना वाटते.यान बंगालच्या खाडीत परतणार...बंगालच्या खाडीला लागून असलेल्या आंध्र प्रदेशच्या प्रक्षेपण तळावरून आरएलव्ही-टीडीचे प्रक्षेपण केले जाईल. इस्रोचे डेल्टा पंख लावलेले हे यान बंगालच्या खाडीत परतेल. >भारत पाचवा देश ठरणार... अमेरिका, फ्रान्स, रशिया आणि जपाननंतर संचालित स्पेस शटल पाठविणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होेणार आहे. अमेरिकेने स्पेस शटल १३५ वेळा अंतराळात पाठविण्याचा मान पटकावला. २०११मध्ये त्याचे आयुष्य संपुष्टात आले. या यानाची अंतराळयात्री अवकाशात पाठविण्याची क्षमता संपुष्टात आली आहे. रशियाचे स्पेस शटल १९८९मध्ये पहिल्यांदा अंतराळात गेले होते. फ्रान्स आणि जपाननेही काही प्रायोगिक उड्डाणे पार पाडली. चीनला मात्र हा प्रयत्न करता आला नाही.>हनुमानउडी घेण्याच्या दिशेने टाकलेले हे छोटे पाऊल आहे. अंतिम ढाचा तयार करण्यासाठी किमान १० ते १५ वर्षे लागतील, कारण मानवासह अवकाशात जाणाऱ्या पुनर्वापरायोग्य यानाचे डिझाईन तयार करणे हा पोरखेळ नाही.- के. सिवान, संचालक, विक्रम साराभाई अंतराळ केंद्र