शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

‘इस्रो’ घेणार स्वदेशी ‘स्पेस शटल’ची भरारी!

By admin | Updated: May 16, 2016 04:45 IST

उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी पुन्हा वापरता येणारे पूर्णपणे देशी बनावटीचे पहिले अंतराळ यान (स्पेस शटल) विकसित करण्याची तयारी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) करीत आहे.

तिरुवनंतपुरम : उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी पुन्हा वापरता येणारे पूर्णपणे देशी बनावटीचे पहिले अंतराळ यान (स्पेस शटल) विकसित करण्याची तयारी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) करीत आहे. विमानासारखे पंख असलेले ‘आरएलव्ही-टीडी’ हे ‘इस्रो’चे पुनर्वापरयोग्य यान अंतराळात झेपावेल तेव्हा देशाने नवा इतिहास रचलेला असेल. ‘चांद्रयान’ मोहीम फत्ते करून जगाचे लक्ष वेधणाऱ्या आणि मोजक्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसणाऱ्या इस्रोच्या शीरपेचात त्यामुळे मानाचे आणखी एक पीस रोवले जाईल.आकार व वजनाने ‘एसयूव्ही’ मोटारीएवढे असलेल्या या भारतीय ‘स्पेस शटल’ला पहिल्या अंतराळ सफरीवर रवाना करण्याची मोहीम अंतिम टप्प्यात आहे. याआधी अंतराळ तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या अमेरिकेसह इतरही काही देशांनी उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी व अंतराळ सफरींसाठी अशा ‘स्पेस शटल’चा वापर केला. मात्र कालांतराने अपघात व न परवडणाऱ्या आर्थिक गणितामुळे त्यांनी ही कल्पना सोडून दिली किंवा अशा वाहनांचा वापर बंद केला. भारताच्या अभियंत्यांनी काटकसरीवर भर देत रॉकेटच्या पुनर्वापरावर भर दिला आहे. पुनर्वापर तंत्रज्ञान यशस्वी झाल्यास अंतराळ प्रक्षेपणावरील खर्च १० पटींनी कमी होऊन प्रति किलो २ हजार डॉलरवर आणला जाऊ शकतो, असे इस्रोच्या वैज्ञानिकांना वाटते.यान बंगालच्या खाडीत परतणार...बंगालच्या खाडीला लागून असलेल्या आंध्र प्रदेशच्या प्रक्षेपण तळावरून आरएलव्ही-टीडीचे प्रक्षेपण केले जाईल. इस्रोचे डेल्टा पंख लावलेले हे यान बंगालच्या खाडीत परतेल. >भारत पाचवा देश ठरणार... अमेरिका, फ्रान्स, रशिया आणि जपाननंतर संचालित स्पेस शटल पाठविणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होेणार आहे. अमेरिकेने स्पेस शटल १३५ वेळा अंतराळात पाठविण्याचा मान पटकावला. २०११मध्ये त्याचे आयुष्य संपुष्टात आले. या यानाची अंतराळयात्री अवकाशात पाठविण्याची क्षमता संपुष्टात आली आहे. रशियाचे स्पेस शटल १९८९मध्ये पहिल्यांदा अंतराळात गेले होते. फ्रान्स आणि जपाननेही काही प्रायोगिक उड्डाणे पार पाडली. चीनला मात्र हा प्रयत्न करता आला नाही.>हनुमानउडी घेण्याच्या दिशेने टाकलेले हे छोटे पाऊल आहे. अंतिम ढाचा तयार करण्यासाठी किमान १० ते १५ वर्षे लागतील, कारण मानवासह अवकाशात जाणाऱ्या पुनर्वापरायोग्य यानाचे डिझाईन तयार करणे हा पोरखेळ नाही.- के. सिवान, संचालक, विक्रम साराभाई अंतराळ केंद्र