जय मल्हार मालिकेतून घराघरात पोहचलेली सुरभी हांडे
By admin | Updated: April 24, 2016 00:40 IST
येणार्या अडचणी, प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी, जिद्द, चिकाटी, मेहनत, संयम ठेवून अपयश, अपमान पचविण्याची ताकद आणि प्रचंड आत्मविश्वास असेल तरच आजच्या स्पर्धेच्या जगात टिकाव लागेल, याची जाणीव सुरभिला आई वडिलांनी पाच वर्षापूर्वीच क रून दिली.
जय मल्हार मालिकेतून घराघरात पोहचलेली सुरभी हांडे
येणार्या अडचणी, प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी, जिद्द, चिकाटी, मेहनत, संयम ठेवून अपयश, अपमान पचविण्याची ताकद आणि प्रचंड आत्मविश्वास असेल तरच आजच्या स्पर्धेच्या जगात टिकाव लागेल, याची जाणीव सुरभिला आई वडिलांनी पाच वर्षापूर्वीच क रून दिली. तिच्या अभिनयाची दखल घेत तिला झी मराठी उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, म.टा. पुरस्कार, बेस्ट फेस ऑफ इअर, सलाम पुणे, बेस्ट फोटोजेनिक फे स, उत्कृष्ट युवा कलाकार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. चांगले राहणीमान, चांगले कपडे, चांगले विचार, बोलणे आणि बुध्दिमत्ता या बरोबरच आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन या बाबी यशस्वीतेसाठी जमेच्या बाजू आहेत. हे सुरभि आवर्जर्ून सांगते.