शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

कोळसा खाणपट्टय़ांचा भाग्याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाच्या हाती

By admin | Updated: September 9, 2014 03:58 IST

केंद्र सरकारने २१८ कोळसा खाणपट्टे वाटप प्रकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयावर सोडून दिला आहे. न्यायालयाने या खाणपट्टय़ांचे वाटप बेकायदेशीर घोषित केले होते.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने २१८ कोळसा खाणपट्टे वाटप प्रकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयावर सोडून दिला आहे. न्यायालयाने या खाणपट्टय़ांचे वाटप बेकायदेशीर घोषित केले होते. चालू वर्षात पाच कोटी टन कोळसा उत्पादन करण्यासाठी सुमारे ४0 खाणींमध्ये उत्पादन सुरू आहे आणि इतर सहा खाणी यासाठी तयार आहेत, असे सरकारने न्यायालयाला सांगितले.कोळसा मंत्रालयाने यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यामध्ये अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांचे १ मे रोजीचे वक्तव्य देखील आहे. न्यायालयाने बेकायदेशीर घोषित केलेले वाटप रद्द केल्याबद्दल सरकारला आपेक्ष नाही तसेच सरकार लिलावासाठी विशेष प्रकारची पद्धती अवलंबण्यावर भरदेखील देत नाही, असे रोहतगी यांनी म्हटले होते. कोळसा उत्पादन करीत असलेल्या सुमारे ४0 खाणी आणि २0१४-१५ दरम्यान उत्पादन सुरू करणार्‍या संभावित सहा खाणींचे विवरण न्यायालयाच्या निर्देशानंतर प्रतिज्ञापत्रात देण्यात आले. या खाणींमुळे चालू वर्षात सुमारे पाच कोटी टन कोळशाचे उत्पादन होईल, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. कोळसा मंत्रालयाने कोळसा उत्पादन करीत असलेल्या ४0 खाणी आणि उत्पादनासाठी तयार असलेल्या सहा खाणींबाबत वाटप करणार्‍यांकडून मिळालेली माहिती न्यायालयात सादर केली. यामध्ये खाणपट्टे, उत्पादनाची सुरुवात आणि उत्पादनाचा अंतिम उपयोग आणि गुंतवणुकीबद्दलच्या माहितीचा समावेश आहे. उत्पादन करीत असलेल्या ४0 खाणींपैकी दोन खाणींचे वाटप अल्ट्रा मेगा वीज प्रकल्पासाठी करण्यात आले आहे. त्यांना २५ ऑगस्टच्या आदेशात बेकायदेशीर घोषित करण्यात आलेले नाही. (वृत्तसंस्था)