शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत सत्तास्थापनेप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले

By admin | Updated: October 28, 2014 12:51 IST

दिल्लीत लागू असलेल्या राष्ट्रपती राजवटीच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला फटकारले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - दिल्लीत लागू असलेल्या राष्ट्रपती राजवटीच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकार व उपाराज्यपालांना फटकारले. लोकशाही देशात राष्ट्रपती राजवट कायमस्वरूपी लागू होऊ शकत नाही असे सुनावत राज्यात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घ्यायला इतका वेळ का लागला असा सवालही न्यायालयाने विचारला. 
आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू आहे. मात्र दिल्ली विधानसभा बरखास्त करून राज्यात पुन्हा निवडमूक घेण्यात यावी अशी मागणी करत 'आप'तर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व राज्यपालांना कठोर शब्दांत सुनावले. 
सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला दिल्लीत सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण देण्यास राष्ट्रपतींनी राज्यपालांना परवानगी दिली आहे. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाकडे पुरेसे संख्याबळ आहे का? तसेच हा निर्णय घेण्यासाठी इतका वेळ का लागला अशी विचारणाही न्यायालयाने केली.