शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

पंतप्रधान मोदींच्या लाहोर दौ-याचे संघाकडून समर्थन

By admin | Updated: January 6, 2016 10:35 IST

पठाणकोट हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या लाहोर भेटीच्या निर्णयावर टीका होत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोदींच्या पाठिशी ठामपणे उभा आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ६ - पंजाबच्या पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाहोर येथे जाऊन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतल्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत असून त्यांच्या या निर्णयावर सर्व स्तरांतून टीकाही होत आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र पंतप्रधान मोदींच्या पाठिशी ठामपणे उभा असून संघाने त्यांच्या या दौ-याचे समर्थन केले आहे. 'पंतप्रधान मोदींनी लाहोर येथे नवाज शरीफ यांची भेट घेऊन कोणतीही चूक केलेली नाही. पंतप्रधानांनी कोणत्या वेळेसे कोणाला भेटायचं हा त्यांचा विशेषाधिकार असल्याचे सांगत पाकिस्तानसोबत चर्चा होणे गरजेचे असल्याचे मत संघाने व्यक्त केले.
२५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी लाहोर येथे जाऊन शरीफ यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अवघ्या आठवड्याभरात पंजाबच्या पठाणकोटमधील भारतीय हवाईदलाच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला. त्यामुळे मोदींची 'बर्थडे डिप्लोमसी' व्यर्थ ठरल्याचा सूर सर्व स्तरांतून उमटू लागला. मात्र संघाने मोदींना दिलासा देत त्यांचा लाहोर दौरा योग्य असल्याचे सांगत पाकिस्तानशी चर्चा होतच राहिली पाहिजे, अशी भूमिका मांडली. ' पाकिस्तानमध्ये काही भारतविरोधी गट असून ते भारतात दहशतवादी हल्ले करत असतात. त्यांना पूर्वी  पाकिस्तान सरकारचा पाठिंबा असायचा, मात्र आता तशी परिस्थिती दिसत नाही' असे मत संघाचे नेते मा.गो.वैद्य यांनी मांडले. भारताने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे करणे अथवा कोणतीही चर्चा करण्याबद्दल भारतात सर्वसाधारणपणे नकारात्मक वातावरण आहे, याची संघाला कल्पना आहे. मात्र शेजारी देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करणेही तितकेच महत्वाचे असते, याचीही संघाला जाणीव असून पाकिस्तानसोबतचे सर्व विवाद, कटुता मागे टाकण्याबद्दल संघाने विशेष भर दिला आहे. 
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात संघ-भारतीय जनता पक्षादरम्यान झालेल्या बैठकीनंतर संघाचे नेते दत्तात्रय होसबळे यांच्या विधानामुळे खळबळ माजली होती. ' जशी दोन भावांमध्ये भांडणे होतात, त्याचप्रमाणे कधीकधी भारत-पाकिस्तानसोबतच्या संबंधांमध्ये वितुष्ट येते. त्यामुळेच आपल्याशी भौगोलिकदृष्ट्या व इतिहासाद्वारे जोडल्या गेलेल्या देशाशी संबंध कसे सुधारावेत याबाबत आम्ही चर्चा केली' असे होसबळे यांनी म्हटले होते. 
दरम्यान, पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे करण्यासाठी भारताला अतिशय मजबूत स्थितीत असणे आवश्यक आहे, असे संघाचे मानणे आहे. पाकिस्तानशी होणा-या चर्चेदरम्यान भारताने आपली ताकद व अंतर्गत सुरक्षेशी कोणतीही तडजोड करता कामा नये, असे मतही संघाने नमूद केले आहे. 
शनिवार २ जानेवारी रोजी पहाटे लष्कराच्या वेषात आलेल्या काही दहशतवाद्यांनी पंजाबच्या पठाणकोट येथील हवाई दलाच्या तलावर जोरदार हल्ला चढवत अंदाधुंद गोळीबार केला. एअरबेसवर हल्ला करणारे सर्व सहा अतिरेकी ठार झाले आहेत. मात्र हे ऑपरेशन अद्यापही संपलेले नाही. या हल्ल्यात ७ जवान शहीद झाले तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. 
दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून पठाणकोट येथे हल्ला करणा-याविरोधात कारवाईचे आश्वासन दिले असून अमेरिकेनेही पाकिस्तानला शब्द पाळण्याबाबत बजावले आहे.