शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींच्या लाहोर दौ-याचे संघाकडून समर्थन

By admin | Updated: January 6, 2016 10:35 IST

पठाणकोट हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या लाहोर भेटीच्या निर्णयावर टीका होत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोदींच्या पाठिशी ठामपणे उभा आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ६ - पंजाबच्या पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाहोर येथे जाऊन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतल्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत असून त्यांच्या या निर्णयावर सर्व स्तरांतून टीकाही होत आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र पंतप्रधान मोदींच्या पाठिशी ठामपणे उभा असून संघाने त्यांच्या या दौ-याचे समर्थन केले आहे. 'पंतप्रधान मोदींनी लाहोर येथे नवाज शरीफ यांची भेट घेऊन कोणतीही चूक केलेली नाही. पंतप्रधानांनी कोणत्या वेळेसे कोणाला भेटायचं हा त्यांचा विशेषाधिकार असल्याचे सांगत पाकिस्तानसोबत चर्चा होणे गरजेचे असल्याचे मत संघाने व्यक्त केले.
२५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी लाहोर येथे जाऊन शरीफ यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अवघ्या आठवड्याभरात पंजाबच्या पठाणकोटमधील भारतीय हवाईदलाच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला. त्यामुळे मोदींची 'बर्थडे डिप्लोमसी' व्यर्थ ठरल्याचा सूर सर्व स्तरांतून उमटू लागला. मात्र संघाने मोदींना दिलासा देत त्यांचा लाहोर दौरा योग्य असल्याचे सांगत पाकिस्तानशी चर्चा होतच राहिली पाहिजे, अशी भूमिका मांडली. ' पाकिस्तानमध्ये काही भारतविरोधी गट असून ते भारतात दहशतवादी हल्ले करत असतात. त्यांना पूर्वी  पाकिस्तान सरकारचा पाठिंबा असायचा, मात्र आता तशी परिस्थिती दिसत नाही' असे मत संघाचे नेते मा.गो.वैद्य यांनी मांडले. भारताने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे करणे अथवा कोणतीही चर्चा करण्याबद्दल भारतात सर्वसाधारणपणे नकारात्मक वातावरण आहे, याची संघाला कल्पना आहे. मात्र शेजारी देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करणेही तितकेच महत्वाचे असते, याचीही संघाला जाणीव असून पाकिस्तानसोबतचे सर्व विवाद, कटुता मागे टाकण्याबद्दल संघाने विशेष भर दिला आहे. 
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात संघ-भारतीय जनता पक्षादरम्यान झालेल्या बैठकीनंतर संघाचे नेते दत्तात्रय होसबळे यांच्या विधानामुळे खळबळ माजली होती. ' जशी दोन भावांमध्ये भांडणे होतात, त्याचप्रमाणे कधीकधी भारत-पाकिस्तानसोबतच्या संबंधांमध्ये वितुष्ट येते. त्यामुळेच आपल्याशी भौगोलिकदृष्ट्या व इतिहासाद्वारे जोडल्या गेलेल्या देशाशी संबंध कसे सुधारावेत याबाबत आम्ही चर्चा केली' असे होसबळे यांनी म्हटले होते. 
दरम्यान, पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे करण्यासाठी भारताला अतिशय मजबूत स्थितीत असणे आवश्यक आहे, असे संघाचे मानणे आहे. पाकिस्तानशी होणा-या चर्चेदरम्यान भारताने आपली ताकद व अंतर्गत सुरक्षेशी कोणतीही तडजोड करता कामा नये, असे मतही संघाने नमूद केले आहे. 
शनिवार २ जानेवारी रोजी पहाटे लष्कराच्या वेषात आलेल्या काही दहशतवाद्यांनी पंजाबच्या पठाणकोट येथील हवाई दलाच्या तलावर जोरदार हल्ला चढवत अंदाधुंद गोळीबार केला. एअरबेसवर हल्ला करणारे सर्व सहा अतिरेकी ठार झाले आहेत. मात्र हे ऑपरेशन अद्यापही संपलेले नाही. या हल्ल्यात ७ जवान शहीद झाले तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. 
दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून पठाणकोट येथे हल्ला करणा-याविरोधात कारवाईचे आश्वासन दिले असून अमेरिकेनेही पाकिस्तानला शब्द पाळण्याबाबत बजावले आहे.