शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

अशी झाली म्यानमारमधील कारवाई

By admin | Updated: June 11, 2015 08:59 IST

भारतीय लष्कर आणि वायूदलाने एकत्र येत सीमा ओलांडून म्यानमारमध्ये बंडखोरांचे तळ उद्ध्वस्त केले. भारतीय लष्कराच्या इतिहासात ही केवळ अभूतपूर्व घटना

नवी दिल्ली : भारतीय लष्कर आणि वायूदलाने एकत्र येत सीमा ओलांडून म्यानमारमध्ये बंडखोरांचे तळ उद्ध्वस्त केले. भारतीय लष्कराच्या इतिहासात ही केवळ अभूतपूर्व घटना नसून भारत आक्रमक प्रत्युत्तर देऊ शकतो, असा संदेशच भारताने दिला आहे. विशेषत: भारतातील सशस्त्र बंडखोरांना चीन मदत करत असल्याच्या गुप्त वार्तेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरते. चीन भारताच्या सर्व बाजूंनी गुंतवणूक करत म्यानमार, श्रीलंका, मालदीव, पाकिस्तान अशी मालिका तयार करत आहे, त्याचप्रमाणे सागरी व्यापारी मार्गाच्या नावाखाली भारताची कोंडी करण्याचीही त्याची योजना आहे. भारताच्या ताज्या साहसी आॅपरेशनमुळे चीनला आपल्या कारवायांचा वेग नक्कीच कमी करावा लागेल, अशी लक्षणे आहेत.गेली अनेक वर्षे ईशान्येकडील बंडखोर आणि अस्थिरतेच्या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. या सात राज्यांमध्ये पायाभूत सुविधा वाढाव्यात, तेथील विद्यार्थ्यांना देशभरात शिक्षणासाठी जायला मिळावे तसेच मुख्य प्रवाहात आपण आहोत याची जाणीव करून देण्यासाठी प्रयत्न सुरूच असतात. तरीही फुटीरवाद्यांच्या हल्ल्यांमुळे व स्थानिक प्रश्नांमुळे त्यावर योग्य तोडगा निघू शकलेला नाही. ४ जून रोजी मणिपूरच्या चंडेल जिल्ह्यामध्ये हल्ला करून अतिरेक्यांनी १८ जवानांचे प्राण घेतल्यामुळे भारतीय सुरक्षा व्यवस्थेला जबरदस्त धक्का बसला. भारतीय लष्कर लवकरच त्याला प्रत्युत्तर देईल आणि त्याची तयारी सुरू आहे अशा बातम्याही त्यानंतर येऊ लागल्या होत्या. दरम्यान, या संघटना ४ जूनच्या हल्ल्याप्रमाणे पुन्हा हल्ले करण्याच्या विचारात होत्या. मात्र त्यापूर्वीच त्यांचे कंबरडे मोडण्यात आले. या सर्व घडामोडी गुप्तरीत्या, जलदगतीने करण्यात आल्या, त्यामुळेच कारवाईनंतर भारतीयांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. (लोकमत न्यूज नेटवर्क)