शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे यश अन् विभाजन

By admin | Updated: September 29, 2014 07:05 IST

काँग्रेसला यावेळी वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्रीपदी फेरनिवड करण्यात आली. १९७२ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने २२२ जागा जिंकत आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले.

काँग्रेसला यावेळी वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्रीपदी फेरनिवड करण्यात आली. १९७२ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने २२२ जागा जिंकत आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले. वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्रीपदी पुन्हा निवड करण्यात आली. त्यांच्यानंतर शंकरराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील हे या कालावधीत मुख्यमंत्री झाले. १९७७ साली प्रथमच महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही एका पक्षाला संपूर्ण बहुमत मिळाले नाही. आणिबाणीमुळे इंदिरा गांधी यांची लोकप्रियता कमी झाल्याने इंदिरा काँग्रेसला ६२ जागा मिळाल्या. काँग्रेसची याच काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (अर्स) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) अशी दोन शकले झाली. या दोन्ही काँग्रेसने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. अर्स काँग्रेसचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री; तर इंदिरा काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले. पुढे शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठित ‘खंजीर खुपसून’ बंड केले आणि ‘पुलोद’चा प्रयोग करून स्वत:च मुख्यमंत्री झाले. पुढे दोनच वर्षांनी म्हणजे १९८० साली पुन्हा निवडणुका झाल्या. केंद्रात इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर ४४.५० टक्के मते मिळविताना २८८ जागांपैकी काँग्रेसने १८६ जागा मिळविल्या. ए.आर. अंतुले हे १९८२ पर्यंत मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील आणि शिवाजीराव निलंगेकर हे या काळात मुख्यमंत्री राहिले. याच काळात काँग्रेसची पुन्हा दोन शकले झाली. १९८१ साली शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत समाजवादी काँग्रेसची स्थापना करीत निवडणूक लढविली. त्यांना ५४ जागा मिळाल्या. त्यानंतर १९९९ साली त्यांंनी नवीन पक्षाची स्थापना केली.