शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे यश अन् विभाजन

By admin | Updated: September 29, 2014 07:05 IST

काँग्रेसला यावेळी वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्रीपदी फेरनिवड करण्यात आली. १९७२ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने २२२ जागा जिंकत आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले.

काँग्रेसला यावेळी वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्रीपदी फेरनिवड करण्यात आली. १९७२ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने २२२ जागा जिंकत आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले. वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्रीपदी पुन्हा निवड करण्यात आली. त्यांच्यानंतर शंकरराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील हे या कालावधीत मुख्यमंत्री झाले. १९७७ साली प्रथमच महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही एका पक्षाला संपूर्ण बहुमत मिळाले नाही. आणिबाणीमुळे इंदिरा गांधी यांची लोकप्रियता कमी झाल्याने इंदिरा काँग्रेसला ६२ जागा मिळाल्या. काँग्रेसची याच काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (अर्स) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) अशी दोन शकले झाली. या दोन्ही काँग्रेसने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. अर्स काँग्रेसचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री; तर इंदिरा काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले. पुढे शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठित ‘खंजीर खुपसून’ बंड केले आणि ‘पुलोद’चा प्रयोग करून स्वत:च मुख्यमंत्री झाले. पुढे दोनच वर्षांनी म्हणजे १९८० साली पुन्हा निवडणुका झाल्या. केंद्रात इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर ४४.५० टक्के मते मिळविताना २८८ जागांपैकी काँग्रेसने १८६ जागा मिळविल्या. ए.आर. अंतुले हे १९८२ पर्यंत मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील आणि शिवाजीराव निलंगेकर हे या काळात मुख्यमंत्री राहिले. याच काळात काँग्रेसची पुन्हा दोन शकले झाली. १९८१ साली शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत समाजवादी काँग्रेसची स्थापना करीत निवडणूक लढविली. त्यांना ५४ जागा मिळाल्या. त्यानंतर १९९९ साली त्यांंनी नवीन पक्षाची स्थापना केली.