शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

जालना रोडवरील भुयारी मार्ग कागदावरच

By admin | Updated: April 25, 2016 00:27 IST

प्रस्तावावर चर्चाच नाही: आराखडा रस्ते विकास महामंडळाकडेच

प्रस्तावावर चर्चाच नाही: आराखडा रस्ते विकास महामंडळाकडेच
औरंगाबाद : जालना रोडवरील अमरप्रीत चौक आणि महावीर चौक येथे २४ कोटी रुपयांतून भुयारी मार्ग करण्याच्या स्थानिक नेत्यांच्या मागणीला राज्य शासनाने तत्त्वत: दिलेली मान्यता कागदावरच राहिली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने तयार केलेला आराखडादेखील अजून विचारात घेतलेला नाही. मोंढानाका हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. महावीर चौक आणि वसंतराव नाईक चौक येथील उड्डाणपुलांंचे काम मे अखेरपर्यंत होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
महावीर चौक आणि अमरप्रीत चौकात भुयारी मार्ग करण्याचा प्रस्ताव गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात शासनाने तत्त्वत: मान्य केला होता. गेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे या कामांसाठी सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार होता. दोन अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यासाठी निधी मिळाला नाही. परिणामी दोन्ही भुयारी मार्गांचे काम कागदावरच राहिले आहे. मोंढा नाका पूल झाल्यामुळे अमरप्रीत चौक, दूध डेअरी चौकात वाहतूक सुरळीत होण्याऐवजी खोळंबा होतो आहे. सातारा-देवळाईकडून येणारी वाहतूक त्या चौकातूनच महावीर चौक व वसंतराव नाईक चौकासह शहरात वळते. त्यामुळे तेथे संग्रामनगर ते अजबनगर असा भुयारी मार्ग करण्याचा प्रस्ताव चर्चेला आला होता. आता या प्रस्तावावर सत्ताधारी आणि प्रशासनातून कुणीही बोलत नाही.

उड्डाणपुलांचे काम संथगतीने
सिडको आणि महावीर चौकातील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरूआहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने मे अखेरीस त्या दोन्ही पुलांचे काम पूर्ण होईल, असा दावा केला आहे. महावीर चौकातील पुलाला ३१ कोटी ३२ लाख रुपये खर्च आहे. ६५५ मीटर पुलाची एकूण लांबी आहे, तर १६ मीटर रुंदी आहे. ५.५ मीटर पुलाची उंची आहे. १८ महिन्यांत पुलाचे काम करणे बंधनकारक होते; परंतु २८ महिन्यांपासून त्या पुलाचे काम सुरू आहे. ३१ जानेवारी २०१४ रोजी त्या पुलाचे काम सुरू झाले आहे. ३१ जुलै २०१५ ही पुलाचे काम संपण्याची डेडलाईन होती. वसंतराव नाईक चौक, सिडको येथील पुलाची डेडलाईन १३ फे बु्रवारी २०१६ रोजीच संपली आहे. ५६ कोटी २५ लाख रुपयांतून त्या पुलाचे काम सुरू आहे. १००१ मीटर पुलाची लांबी आहे. १४ मीटर रुंदी आहे. ५.५ मीटर इतकी पुलाची उंची आहे. २४ महिने पुलाच्या कामाची मुदत होती.