शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ म्हणायचे मी आणखी १० वर्ष जगणार सुभाष चौधरी यांनी दिला आठवणींना उजाळा : लिस्टेरिया विकाराने केला मोठ्या भाऊंचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2016 00:22 IST

जळगाव : गांधी विचारच या जगाला युद्धापासून वाचविणार आहे. या विचारांच्या प्रचार व प्रसारासाठी त्यासाठी आपण किमान दहा वर्ष जगणार असल्याचा विश्वास भवरलाल जैन यांनी व्यक्त केला होता. मात्र लिस्टेरिया या घातक आजाराने त्यांचा घात केलाआणि ११ दिवसांच्या मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली.

जळगाव : गांधी विचारच या जगाला युद्धापासून वाचविणार आहे. या विचारांच्या प्रचार व प्रसारासाठी त्यासाठी आपण किमान दहा वर्ष जगणार असल्याचा विश्वास भवरलाल जैन यांनी व्यक्त केला होता. मात्र लिस्टेरिया या घातक आजाराने त्यांचा घात केलाआणि ११ दिवसांच्या मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली.
२७ जानेवारी रोजी मोठे भाऊ यांना चक्कर येऊन पहिला ॲटक आला. यावेळी विविध चाचण्या केल्यानंतर त्यांच्या डाव्या मेंदूला सुज आल्याचे निदान झाले. सर्वसाधारणपणे रक्तवाहिनी बंद पडल्यामुळे ही स्थिती निर्माण होते. त्यानंतर त्यांना मुंबईला उपचारासाठी रवाना करण्यात आली. काही दिवसानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी उठतांना त्यांच्या पायाला त्रास होऊ लागला. आजारपणातून बरे झाल्यामुळे त्यांना त्रास होत असावा असे डॉक्टरांसह सर्वांनाच वाटले. तपासणी केल्यानंतर मात्र पायाच्या नसांमध्ये न्युरोपथी असल्याचे निदान झाले. औषधोपचारानंतरही प्रकृती खालावत असल्याने त्यांना १४ रोजी पुन्हा मुंबई येथे उपचारासाठी हलविण्यात आले. त्या दिवशी सकाळी ९ वाजता विमान तयार होते. मात्र त्या दिवशी मोठे भाऊ यांना मुंबईला जाण्याची इच्छा नव्हती. मात्र डॉ.सुभाष चौधरी व कुटुंबियांनी त्यांना समजावल्यानंतर दुपारी दोन वाजता त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले.
मुंबईला उपचार सुरु असताना त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यावर डॉ.सुभाष चौधरी यांनी अतिदक्षता विभागात दाखल होण्याबाबत मोठ्या भाऊंना सांगितले. त्यांनी संमती दर्शविल्यानंतर सकाळी १० वाजता त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
१५ फेब्रुवारी रोजी रात्री त्यांना पुन्हा दोन झटके आल्याने ते बेशुद्ध पडले. त्यानंतर केलेल्या तपासणीत प्लेटलेट कमी झाल्याचे लक्षात आले. आजाराचे निदान करण्यासाठी तीन ठिकाणी रक्तांची चाचणी करण्यात आल्या. त्यात लिस्टेरिया या विकाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याचे डॉ.सुभाष चौधरी यांनी सांगितले. हा विकार मेंदूपर्यंत पोहचल्याने सेफ्टी सिमीया होऊन रक्तदाब कमी झाला. १५ फेब्रुवारीनंतर ते बेशुद्ध झाले ते शेवटपर्यंत शुद्धीवर आले नाहीत. लिस्टेरिया या आजारावरील उपचार सुरु असताना तज्ज्ञ डॉक्टरांचे स्वतंत्र पथक हे अमेरिका, लंडन यासह विविध देशातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या संपर्कात होते. मात्र शरीर साथ देत नसल्याने ते बेशुद्धावस्थेत होते.