शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी बंडखोरंच असायला हवं, त्याशिवाय बदल कसा घडणार - प्रकाश जावडेकर

By admin | Updated: July 7, 2016 18:23 IST

भारतामध्ये शिक्षणामध्ये नावीन्य दिसत नाही कारण मुलांना प्रश्न विचारण्यापासून रोखलं जातं. ही प्रथा बंद व्हायला हवी असं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - भारतामध्ये शिक्षणामध्ये नावीन्य दिसत नाही कारण मुलांना प्रश्न विचारण्यापासून रोखलं जातं. ही प्रथा बंद व्हायला हवी असं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं असून नावीन्यासाठी बंडखोरीही आवश्यक असल्याचं ते गुरुवारी म्हणाले.
तुम्ही बंडखोर नसाल, आहे त्या परिस्थितीला बदलण्यासाठी आव्हान देत नसाल तर बदल कसा घडेल, नावीन्य कसं येईल असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. शिक्षणामध्ये बदल घडवण्याचं, नावीन्य आणण्याचं आमचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 
कुतूहल दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण प्रोत्साहन देत नाही, प्रश्न विचारण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत नाही असं निरीक्षण जावडेकरांनी नोंदवलं आहे. मुलांना प्रश्न पडले पाहिजेत आणि त्यांनी ते विचारले पाहिजेत असंही जावडेकरांनी म्हटलं आहे.
जर मुलांमधलं कुतूहल जागृत केलं तर नावीन्य येईल आणि परीवर्तन घडेल असेही त्यांनी स्पष्ट केले. आनंद बाझार पत्रिकेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 
टिकाऊ व शाश्वत विकास हा मोदी सरकारचा मंत्र असून तो निसर्गाची हेळसांड करत नसल्याचे जावडेकर म्हणाले. अर्थात, त्यासाठी नवनवीन प्रयोग आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रसारमाध्यमांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रानं क्रांती केली. नव्या कल्पना आल्या आणि बदल झाला असा दाखला त्यांनी दिला. स्टीव्ह जॉब्जनी 1990 मध्ये स्मार्ट फोनचं आणि त्याच्या विविध उपयोगांचं भाकीत केलं होतं याची आठवण जावडेकरांनी यावेळी करून दिली.