शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

विद्यार्थ्यांनी बंडखोरंच असायला हवं, त्याशिवाय बदल कसा घडणार - प्रकाश जावडेकर

By admin | Updated: July 7, 2016 18:23 IST

भारतामध्ये शिक्षणामध्ये नावीन्य दिसत नाही कारण मुलांना प्रश्न विचारण्यापासून रोखलं जातं. ही प्रथा बंद व्हायला हवी असं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - भारतामध्ये शिक्षणामध्ये नावीन्य दिसत नाही कारण मुलांना प्रश्न विचारण्यापासून रोखलं जातं. ही प्रथा बंद व्हायला हवी असं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं असून नावीन्यासाठी बंडखोरीही आवश्यक असल्याचं ते गुरुवारी म्हणाले.
तुम्ही बंडखोर नसाल, आहे त्या परिस्थितीला बदलण्यासाठी आव्हान देत नसाल तर बदल कसा घडेल, नावीन्य कसं येईल असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. शिक्षणामध्ये बदल घडवण्याचं, नावीन्य आणण्याचं आमचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 
कुतूहल दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण प्रोत्साहन देत नाही, प्रश्न विचारण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत नाही असं निरीक्षण जावडेकरांनी नोंदवलं आहे. मुलांना प्रश्न पडले पाहिजेत आणि त्यांनी ते विचारले पाहिजेत असंही जावडेकरांनी म्हटलं आहे.
जर मुलांमधलं कुतूहल जागृत केलं तर नावीन्य येईल आणि परीवर्तन घडेल असेही त्यांनी स्पष्ट केले. आनंद बाझार पत्रिकेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 
टिकाऊ व शाश्वत विकास हा मोदी सरकारचा मंत्र असून तो निसर्गाची हेळसांड करत नसल्याचे जावडेकर म्हणाले. अर्थात, त्यासाठी नवनवीन प्रयोग आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रसारमाध्यमांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रानं क्रांती केली. नव्या कल्पना आल्या आणि बदल झाला असा दाखला त्यांनी दिला. स्टीव्ह जॉब्जनी 1990 मध्ये स्मार्ट फोनचं आणि त्याच्या विविध उपयोगांचं भाकीत केलं होतं याची आठवण जावडेकरांनी यावेळी करून दिली.