शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भारत,चीनमधील संबंध दृढ करण्यासाठी भरीव पावले

By admin | Updated: February 3, 2015 02:12 IST

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. परस्पर सहकार्यासंदर्भात भारत व चीन यांनी भरीव पावले उचलली असल्याचे यावेळी जिनपिंग यांनी सांगितले.

बीजिंग : भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. परस्पर सहकार्यासंदर्भात भारत व चीन यांनी भरीव पावले उचलली असल्याचे यावेळी जिनपिंग यांनी सांगितले. भारत व चीन यांच्यातील संबंधांच्या भवितव्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. भारत व चीन यांच्यातील परस्पर संबंधांबाबत यावर्षी चांगली प्रगती झाली आहे असे जिनपिंग म्हणाले. ग्रेट हॉल आॅफ पीपलमध्ये स्वराज व जिनपिंग यांची भेट झाली. (वृत्तसंस्था)कैलास मानसरोवर यात्रा1 भारत-चीन संबंध प्रगतीतील महत्त्वाचे पाऊल म्हणून कैलास मानसरोवर यात्रेसाठी नवा मार्ग खुला करण्यासंदर्भात रविवारी झालेल्या कराराचा त्यांनी उल्लेख केला. जूनपासून सिक्कीम तिबेट मार्गे ही यात्रा करता येईल. प्रवास अधिक सोयीचा झाल्याने ही यात्रा करणाऱ्या भारतीय यात्रेकरूंच्या संख्येत वाढ होईल असे शी म्हणाले. शी यांनी सप्टेंबर महिन्यातील भारत दौऱ्यात मानसरोवरासाठी नवा मार्ग खुला करण्याचे आश्वासन दिले होते. दुर्मिळ स्वागत 2 चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग कोणत्याही देशाच्या परराष्ट्र मंत्र्याचे क्वचितच स्वागत करतात, त्यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे स्वागत केले. याचाच अर्थ त्यांच्या मनात भारताबद्दल मैत्रीची दृढ भावना आहे असे मानले जात आहे. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्या शुभेच्छा सांगा असेही शी जिनपिंग यांनी सुषमा स्वराज यांना सांगितले. नवे वळण 3 गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मी भारताला भेट दिली, त्यानंतर चीन व भारत संबंधात नवे वळण आले आहे. भारत व चीन यांच्यात आता सकारात्मक नाते सुरू झाले आहे. दोन्ही देशांत सहकार्य सुरू झाले असून, त्यासाठी भरीव पावले उचलण्यात आली आहेत. भारत भेटीची आठवण 4 या दौऱ्यात जिनपिंग गुजरातला गेले होते. भारत दौऱ्याच्या अनेक मधुर आठवणी माझ्याजवळ आहेत असे त्यांनी स्वराज यांना सांगितले. पंतप्रधान मोदी स्वत: माझ्याबरोबर गुजरातला आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही माझे स्वागत केले असे शी म्हणाले.