शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

टाकळीभान बंद, रास्ता रोको

By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST

टाकळीभान : शेत जमिनीच्या वादातून आदिवासी समाजावर जळीताचे खोटे गुन्हे दाखल करून अन्याय केल्याच्या निषेधार्थ बुधवारी टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथे बस थांब्यासमोर दीड तास रास्ता रोको करुन गावबंद आंदोलन करण्यात आले.

टाकळीभान : शेत जमिनीच्या वादातून आदिवासी समाजावर जळीताचे खोटे गुन्हे दाखल करून अन्याय केल्याच्या निषेधार्थ बुधवारी टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथे बस थांब्यासमोर दीड तास रास्ता रोको करुन गावबंद आंदोलन करण्यात आले.
भिल्ल समाजाचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, रिपाइंचे आबासाहेब रणनवरे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाच्या महिलांसह रास्तारोको करण्यात आला. गट क्रमांक १४१/१ मधील शेतजमीन चंद्रभान सूर्यभान गांगुर्डे यांच्या वडिलांच्या मालकीची आहे. पण त्यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन अनिल कांबळे व पोपट धस यांनी तलाठ्यास हाताशी धरुन जमिनीचे खोटे रेकॉर्ड बनवून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. प्रकरण हाताबाहेर जात असल्याने त्यांनी कट कारस्थान रचून आदिवासी समाजावर जळीताचे खोटे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले. पोलिसांनी याबाबत शहानिशा न करताच गुन्हे दाखल करुन समाजावर अन्याय केल्याचे गांगुर्डे म्हणाले.
माजी सभापती नानासाहेब पवार म्हणाले, आदिवासी समाज प्रामाणिक आहे. घर जाळण्यासारखे वाईट कृत्य त्यांच्याहातून होणार नाही. पण त्यांच्यावर जळीताचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. आम्ही सर्व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.
तंटामुक्तीचे अध्यक्ष भाऊसाहेब दाभाडे म्हणाले, कांबळे यांनी पोलिसांना हाताशी धरुन आदिवासींवर खोटे गुन्हे दाखल केले. घटनेची फेरचौकशी करून सत्य उजेडात आणावे.
यावेळी काँग्रेसचे राजेंद्र कोकणे, भाजपचे बंडू हापसे, कचरू गायकवाड यांची भाषणे झाली. तहसील कार्यालयाचे एस. बी. पाटोळे, तलाठी आकांक्षा ठोके, हिवाळे, फौजदार यशवंत राक्षे, तुरनर यांनी निवेदन स्वीकारले. (वार्ताहर)
-----------
फोटोफाईलनेम १९०८-एसएचआर-०५टाकळीभान रास्तारोको.जेपीजी
टाकळीभान (ता.श्रीरामपूर) येथे आदिवासींवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ बुधवारी रास्तारोको करून गाव बंद आंदोलन करण्यात आले.