शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

आमच्या अंतर्गत विषयांपासून दूर रहा, भारताने पाकिस्तानला सुनावले

By admin | Updated: July 12, 2016 07:49 IST

काश्मीरमधल्या स्फोटक परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी पाकिस्तानने नेहमीप्रमाणे या मुद्यावरुन राजकारण सुरु केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १२ - काश्मीरमधल्या स्फोटक परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी पाकिस्तानने नेहमीप्रमाणे या मुद्यावरुन राजकारण सुरु केले आहे. बुरहान वानीच्या मृत्यूने आपल्याला धक्का बसल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे.
 
एवढयावरच न थांबता सोमवारी संध्याकाळी पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव अझीझ चौधरी यांनी भारताचे राजदूत गौतम बामबावले यांना बोलवून काश्मीरमधल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. बुरहान वानीच्या मृत्यूची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी पाकिस्तानने केली आहे. 
 
पाकिस्तानच्या या कृतीला भारतानेही तितक्याच कठोर शब्दात सडेतोड उत्तर दिले आहे. काश्मीर भारताचा अंतर्गत विषय असून, पाकिस्तानने त्यात ढवळाढवळ करु नये असे भारताने म्हटले आहे. पाकिस्तानच्या विधानांवरुन आजही त्यांची दहशतवादाला साथ असून ते एक धोरण म्हणून दहशतवादाचा वापर करताना दिसतात असे भारताने म्हटले आहे. 
 
बुरहान वानी हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी होता. शुक्रवारी सुरक्षापथकांबरोबर झालेल्या चकमकीत तो मारला गेला. त्यानंतर काश्मीर खो-यात हिंसाचार उसळला असून, आतापर्यंत या हिंसाचारात २५ पेक्षा जास्त जण ठार झाले आहेत. पाकिस्तानसाठी बुरहान वानी दहशतवादी नसून काश्मीरी नेता होता.