शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

राज्य सरकारनेच अडविले शेतकर्‍यांचे सातशे कोटी रब्बीचे ७१३ कोटी तिजोरीत पडून : केंद्राने मदत देऊन महिना उलटला

By admin | Updated: October 22, 2016 00:47 IST

अहमदनगर : रब्बी पिकांच्या नुकसानभरपाईपोटी केंद्राने दिलेले पंधराशे कोटी राज्य सरकारच्या तिजोरीत पडून आहेत़ महिना उलटूनही हा निधी जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत अद्यापही झिरपला नाही़ शेतकर्‍यांच्या नावाने गळा काढणार्‍या सरकारनेच शेतकर्‍यांचे सातशे कोटी अडविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ सरकारच्या या उदासीनतेबाबत जिल्‘ातील शेतकर्‍यांकडून नाराजी व्यक्त होत आहे़

अहमदनगर : रब्बी पिकांच्या नुकसानभरपाईपोटी केंद्राने दिलेले पंधराशे कोटी राज्य सरकारच्या तिजोरीत पडून आहेत़ महिना उलटूनही हा निधी जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत अद्यापही झिरपला नाही़ शेतकर्‍यांच्या नावाने गळा काढणार्‍या सरकारनेच शेतकर्‍यांचे सातशे कोटी अडविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ सरकारच्या या उदासीनतेबाबत जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून नाराजी व्यक्त होत आहे़पुरेसा पाऊस झाल्याने यंदा दुष्काळ हटला़ शेतकर्‍यांनी उधार उसणवारी करून पिके आणली़ पण, अतिवृष्टीने त्यावर नांगर फिरविण्याची वेळ आली़ शेतातून उत्पन्न दूरच़ पण केलेला खर्चही वसूल होऊ शकला नाही़ पाऊस पडूनही पैशांअभावी जिल्ह्यातील बळिराजा हवालदिल आहे़ अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना आर्थिक मदतीची गरज असते़ केंद्राने सरकारने रब्बीच्या दुष्काळ सहाय्यता निधीची घोषणा करून शेतकर्‍यांना एक प्रकारे धीर दिला़ सरकारने सन २०१५-१६ मधील रब्बीच्या नुकसानभरपाईपोटी राज्य सरकारला १ हजार ५०० कोटींची मदत दिली़ राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी अहमदनगर व सोलापूर जिल्हेच फक्त या मदतीस पात्र आहेत़ नगर जिल्हा प्रशासनाने ७१३ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविलेला आहे़ याचाच अर्थ केंद्राकडून मिळालेल्या १ हजार ५०० कोटीतून ७१३ कोटी एकट्या नगर जिल्ह्याला मिळणार आहेत़ परंतु सरकारच्या अनास्थेमुळे ही मदत राज्याच्या तिजोरीतच अडकली आहे़ किमान दिवाळीत तरी सरकार मेहरबान होईल़ रब्बीचे अनुदान खात्यावर जमा कधी होणार, अशी विचारणा शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात दूरध्वनीवरून करत आहेत़ अजून निधी वर्ग झाला नाही़ निधी आल्यानंतर देऊ, असे उत्तर प्रशासनाकडून शेतकर्‍यांना दिले जात आहे़ नगर जिल्ह्यातील ७ लाख हेक्टरवरील रब्बीचे पिके वाया गेली़ बाधित शेतकर्‍यांची ७ लाख ८२ हजार ३६ आहे़ जिल्हा प्रशासनाने ७१३ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव सरकारला पाठविला होता़ त्यानुसारच केंद्राने हा निधीही दिला़ तसे वृत्तही वृत्तपत्रांतून झळकले़ त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या़ परंतु, राज्य सरकारकडून त्यावर अद्याप कोणतही कार्यवाही झाली नाही़ पुढील आठवड्यात जरी हा निधी मिळाला तरी शेतकर्‍यांना बँक खात्यावर तो जमा करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे़ परंतु सरकार ऐन दिवाळीत मेहरबान होणार की नाही, याबाबत साशंकता आहे़़़़़़़़़़़़़