शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘कॉल ड्रॉपची भरपाई देणे सुरू करा’

By admin | Updated: January 5, 2016 00:14 IST

कॉल ड्रॉपच्या वाढत्या तक्रारीसंदर्भात ग्राहकाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून ग्राहकांना भरपाई द्यावी, असे लिखित आदेश दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय)ने दूरसंचार कंपन्यांना दिले

मुंबई : कॉल ड्रॉपच्या वाढत्या तक्रारीसंदर्भात ग्राहकाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून ग्राहकांना भरपाई द्यावी, असे लिखित आदेश दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय)ने दूरसंचार कंपन्यांना दिले असून या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारी २०१६ या पूर्वलक्ष्यीप्रभावापासून करण्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात आपण दाद मागितली असून न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याची भूमिका घेतल्याने तूर्तास तरी ग्राहकांची डोकेदुखी कायम राहिली आहे. ‘टेलिकॉम कन्झ्युमर प्रोटेक्शन रेग्युलेशन’ या नियमावलीत ट्रायने १६ आॅक्टोबर २०१५ रोजी बदल करत, कॉल ड्रॉप झाल्यास प्रति कॉल एक रुपयाची भरपाई देण्याचे आदेश कंपन्यांना दिले. प्रति कॉल ड्रॉप एक रुपया भरपाईचे आदेश असले तरी त्याची कमाल मर्यादा ही दिवसाला तीन कॉलड्रॉपपुरतीच निश्चित केली आहे. यामुळे कितीही कॉल ड्रॉप झाले तरी ग्राहकाला मात्र तीन रुपये एवढीच भरपाई मिळणार आहे. मात्र, तरीही ही भरपाई न देण्याची भूमिका घेत या कंपन्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात ट्रायच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.कंपन्यांना आता न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. मात्र, न्यायालयाने ट्रायच्या या नियमाला स्थगिती आदेश न दिल्यामुळे कंपन्यांना निकालाची प्रतीक्षा न करता ट्रायच्या निर्णयाची अंमबजावणी करणे क्रमप्राप्त असल्याचे मत विधिज्ञांनी व्यक्त केले.