शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

निरोपाच्या भाषणात मुखर्जींनी मानले सर्वांचे आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 21:37 IST

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज आपल्या निरोपाच्या भाषणात सर्वांचे आभार मानले. निरोपाचे भाषण देताना मुखर्जी यांनी आपल्या दीर्घ संसदीय कार्यकाळादरम्यान आलेले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज आपल्या निरोपाच्या भाषणात सर्वांचे आभार मानले. निरोपाचे भाषण देताना मुखर्जी यांनी आपल्या दीर्घ संसदीय कार्यकाळादरम्यान आलेले उतारचढाव, शिकवण आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींपासून लालकृष्ण अडवाणी, सोनिया गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्व ज्येष्ठ नेत्यांचा उल्लेख केला. तसेच जाता जाता सभागृहातील गोंधळामुळे संसदेच्या वेळेच्या होत असलेल्या नुकसानीबाबतही चिंता व्यक्त केली.  
 
निरोपाच्या भाषणात मुखर्जी म्हाणाले, संसदेने मला एक व्यक्ती म्हणून घडवले. लोकशाहीच्या या मंदिराता माझी रचना झाली. त्यामुळे निरोपाच्या वेळी मी काहीसा भावूक झालो आहे. 37 वर्षे मी राज्यसभा आणि लोकसभेचा सदस्य राहिलो. आज माझ्या निरोपासाठी शानदार कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल धन्यवाद. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या नेत्यांचे आभार. 22 जुलै 1969 रोजी मी राजसभेचा सदस्य म्हणून पहिल्या अधिवेशनात सहभागी झालो होतो. 2012 साली देशाचा 13 वा राष्ट्रपती म्हणून नियुक्त झाल्यावर हा प्रवास थांबला. मात्र माझ्या मनात संसदेबाबत असलेली ओढ कायम राहिली." 
 विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जीं यांचा कार्यकाळ उद्या म्हणजेच २४ जुलैच्या मध्यरात्री संपत आहे. नवनियुक्त रामनाथ कोविंद हे 25 जुलै रोजी राष्ट्रपतिपदाची शपथ घेणार आहेत. आता निवृत्तीनंतर प्रणव मुखर्जींना विविध सुविधा मिळणार आहेत. 
प्रेसिडेंट इमॉल्युमेंट अ‍ॅक्ट १९५१ या कायद्यानुसार पूर्व राष्ट्रपतीला पूर्ण सन्मानानुसार राहण्यास सुसज्ज घर मिळते. त्याचबरोबर २ टेलिफोन, एक नॅशनल रोमिंग फ्री मोबाईल फोन, १ सेक्रेटरी आणि ४ खाजगी कर्मचारी, ऑफिस खर्चासाठी प्रत्येकी वर्षाला ६०,०००, एक कार आणि ७५ हजार रुपये (पूर्ण सॅलरीचे अर्धे) पेन्शन देण्यात येते. या सर्व सुविधा रिटायरमेंटनंतर प्रणव मुखर्जींना मिळणार आहेत. कायद्यानुसार वैद्यकीय सेवा तसेच पूर्ण देशात कुठेही फिरण्याची मोफत सुविधा पूर्व-राष्ट्रपतींना मिळते. रेल्वे, विमान, जहाज, इ. अशा देशभरात केलेल्या कोणत्याही प्रवासात राष्ट्रपतींना प्रथम श्रेणीत प्रवास करण्याची मुभा आहे. 
१० राजाजी मार्ग या दिल्लीतल्या निवासस्थानी प्रणव मुखर्जी यापुढे राहणार आहेत. एकेकाळी या बंगल्यातच ए.पी.जे अब्दुल कलामजी राहत होते. या नव्या घरात प्रणव मुखर्जी आपला पूर्ण वेळ वाचन आणि लिखाण यात घालवणार आहेत. त्यांच्या पुढील जीवनासाठी या बंगल्यात पूर्ण व्यवस्था केली गेली आहे.