शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
3
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
4
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
5
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
6
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
7
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
8
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
9
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
10
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
11
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
12
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
13
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
14
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
15
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
16
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
17
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
18
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
19
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
20
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल

रेल्वे अपघातांच्या चौकशीसाठी विशेष समिती:सुरेश प्रभू

By admin | Updated: February 15, 2017 20:34 IST

नेपाळ, दुबईतून संशयित ताब्यात; उर्वरितांना शोधण्याचे प्रयत्नरत्नागिरी : कोकण रेल्वे तसेच देशातील काही अन्य रेल्वे मार्गांवर अपघात घडवून आणण्याचे प्रयत्न काही प्रवृत्तींकडून झाले आहेत. या प्रकरणी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने नेपाळ व दुबईतून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच अशा प्रकारांबाबत विशेष समितीही नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने चौकशीचे काम ...

नेपाळ, दुबईतून संशयित ताब्यात; उर्वरितांना शोधण्याचे प्रयत्नरत्नागिरी : कोकण रेल्वे तसेच देशातील काही अन्य रेल्वे मार्गांवर अपघात घडवून आणण्याचे प्रयत्न काही प्रवृत्तींकडून झाले आहेत. या प्रकरणी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने नेपाळ व दुबईतून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच अशा प्रकारांबाबत विशेष समितीही नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने चौकशीचे काम सुरू केले आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. प्रभू म्हणाले, कोकण रेल्वे मार्गावर मुंबईतील दिवा स्थानकापासून काही अंतरावर गेल्या काही दिवसांत रेल्वे रुळांजवळ स्फोटक जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या होत्या. तसेच रेल्वे रूळांवर अपघात व्हावा, अशा हेतूनेच रेल्वेचे जुने रूळही मार्गावर आडवे टाकून ठेवण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. असेच प्रकार अन्य ठिकाणीही रेल्वेबाबत घडले आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेबरोबरच अन्य रेल्वे यंत्रणाही सतर्क झाली आहे. तसेच केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने यात गंभीरपणे लक्ष घातले आहे. या प्रकारांमागे नेमके कोण आहे, त्याचा छडा लावला जाणार आहे.गेल्या दोन वर्षांच्या काळात कोकण रेल्वेची विकासात्मक घोडदौड अत्यंत वेगाने सुरू असून यातर्फे अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच कोकण रेल्वेच्या प्रकल्पांसाठी २०१७-१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील ही तरतूद समभागांच्या रूपात आहे. चिपळूण-कर्‍हाड मार्गासाठी ३०० कोटी, मार्ग विद्युतीकरणासाठी २०० कोटी, तर रोहा ते वीरपर्यंतच्या मार्ग दुपदरीकरणासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुढील अर्थसंकल्पात आणखी निधीची तरतूद कोकण रेल्वेसाठी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)संभाव्य ६४ अपघात टाळण्यात यशगेल्या काही महिन्यांत ६४ ठिकाणी संभाव्य अपघात टाळण्यात यश आले. कोकण रेल्वे मार्गावरही दिवा स्थानकापासून काही अंतरावर घातपाताचे प्रयत्न केले गेले. परंतु रेल्वे कर्मचारी व प्रवासी, नागरिक यांच्या जागरुकतेमुळे हे अपघात टाळण्यात यश आले. रेल्वे प्रवास हा अत्यंत सुरक्षित व्हावा, यासाठी रेल्वेने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. रेल्वेच्या सुरक्षेसाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार आहे. नागरिकांनीही रेल्वेला सहकार्य केल्यास अपघात टाळणे शक्य होईल, असे प्रभू यावेळी म्हणाले.