शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघातांच्या चौकशीसाठी विशेष समिती:सुरेश प्रभू

By admin | Updated: February 15, 2017 20:34 IST

नेपाळ, दुबईतून संशयित ताब्यात; उर्वरितांना शोधण्याचे प्रयत्नरत्नागिरी : कोकण रेल्वे तसेच देशातील काही अन्य रेल्वे मार्गांवर अपघात घडवून आणण्याचे प्रयत्न काही प्रवृत्तींकडून झाले आहेत. या प्रकरणी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने नेपाळ व दुबईतून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच अशा प्रकारांबाबत विशेष समितीही नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने चौकशीचे काम ...

नेपाळ, दुबईतून संशयित ताब्यात; उर्वरितांना शोधण्याचे प्रयत्नरत्नागिरी : कोकण रेल्वे तसेच देशातील काही अन्य रेल्वे मार्गांवर अपघात घडवून आणण्याचे प्रयत्न काही प्रवृत्तींकडून झाले आहेत. या प्रकरणी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने नेपाळ व दुबईतून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच अशा प्रकारांबाबत विशेष समितीही नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने चौकशीचे काम सुरू केले आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. प्रभू म्हणाले, कोकण रेल्वे मार्गावर मुंबईतील दिवा स्थानकापासून काही अंतरावर गेल्या काही दिवसांत रेल्वे रुळांजवळ स्फोटक जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या होत्या. तसेच रेल्वे रूळांवर अपघात व्हावा, अशा हेतूनेच रेल्वेचे जुने रूळही मार्गावर आडवे टाकून ठेवण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. असेच प्रकार अन्य ठिकाणीही रेल्वेबाबत घडले आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेबरोबरच अन्य रेल्वे यंत्रणाही सतर्क झाली आहे. तसेच केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने यात गंभीरपणे लक्ष घातले आहे. या प्रकारांमागे नेमके कोण आहे, त्याचा छडा लावला जाणार आहे.गेल्या दोन वर्षांच्या काळात कोकण रेल्वेची विकासात्मक घोडदौड अत्यंत वेगाने सुरू असून यातर्फे अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच कोकण रेल्वेच्या प्रकल्पांसाठी २०१७-१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील ही तरतूद समभागांच्या रूपात आहे. चिपळूण-कर्‍हाड मार्गासाठी ३०० कोटी, मार्ग विद्युतीकरणासाठी २०० कोटी, तर रोहा ते वीरपर्यंतच्या मार्ग दुपदरीकरणासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुढील अर्थसंकल्पात आणखी निधीची तरतूद कोकण रेल्वेसाठी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)संभाव्य ६४ अपघात टाळण्यात यशगेल्या काही महिन्यांत ६४ ठिकाणी संभाव्य अपघात टाळण्यात यश आले. कोकण रेल्वे मार्गावरही दिवा स्थानकापासून काही अंतरावर घातपाताचे प्रयत्न केले गेले. परंतु रेल्वे कर्मचारी व प्रवासी, नागरिक यांच्या जागरुकतेमुळे हे अपघात टाळण्यात यश आले. रेल्वे प्रवास हा अत्यंत सुरक्षित व्हावा, यासाठी रेल्वेने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. रेल्वेच्या सुरक्षेसाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार आहे. नागरिकांनीही रेल्वेला सहकार्य केल्यास अपघात टाळणे शक्य होईल, असे प्रभू यावेळी म्हणाले.