ऑनलाइन टीम
वाराणसी, दि. ८ - राजकीय दबावाला बळी पडत निवडणूक आयोगने मला वाराणसीत येण्यापासून मज्जाव केला असल्याची टीका मोदींनी आपल्या भाषणात केली. 'माझ्या मौनात भाषणापेक्षा जास्त सामर्थ्य आहे, तसेच माझ्या भाषणाने असं काय वाईट होतं मला कळत नाही', असंही मोदींनी म्हटले. ते रोहानिया येथे प्रचारसभेत बोलत होते. मी बनारसलाही भेट दिली असून जे मैदान सोडून पळाले त्यांना माझा पोटशुळ आहे, त्यांच्याकडे माझा सामना करण्याची ताकद नाही. माझ्या विरोधकांनी माझ्या सभांना आक्षेप घेतला. या ठिकाणाहून वाराणसी फक्त १२ किलोमिटर दूर आहे. जर मला इथे कोणत्या प्रकारचा धोका नसेल तर वाराणसीत कसा असू शकतो, असा प्रश्नही त्यांनी विचारला. तसेच आपण माओवादी आणि जम्मु- काश्मिर सारख्या संवेदनशील विभागांनाही भेट दिली आहे. मग इथेच अडचण का, मुलायम सिंग यादव आणि अखिलेश यादव यांचे नाव न घेता, पिता- पुत्राचे सरकार असलेल्या राज्यात ते एका माणसाला संरक्षण देऊ शकत नाहीत का, असंही ते या वेळी म्हणाले. तसेच काँग्रेसवर टीका करत त्यांनी मला गंगा आरती पासून रोखले आहे, निवडणुक आयोग तुम्हाला निवडून देणार नसून लोक तुमची सत्ता संपुष्टात आणणार आहेत. असे मोदींनी आपल्या भाषणात म्हटले आहे.