शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

दक्षिण आफ्रिका संघाची रणनीती चकित करणारी, पण पराभव टाळणे कठीण : यादव

By admin | Updated: December 6, 2015 23:33 IST

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात रविवारी चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांच्या बचावात्मक रणनीतीवर आश्चर्य व्यक्त केले.

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात रविवारी चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांच्या बचावात्मक रणनीतीवर आश्चर्य व्यक्त केले. केवळ बचावात्मक पवित्रा स्वीकारीत पाचव्या दिवशी पूर्णवेळ खेळणे शक्य नाही, असे यादव म्हणाला. चौथ्या दिवसाच्या खेळानंतर यादव पत्रकार परिषदेत बोलत होता. यादव म्हणाला,‘७२ षटकांत केवळ ७२ धावा फटकावल्यामुळे आश्चर्य वाटले. दक्षिण आफ्रिका संघ अशी कछवा छाप फलंदाजी करेल, याचा आम्ही विचार केला नव्हता. त्यांनी फटके खेळण्याचा प्रयत्न केला नाही, याचे आश्चर्य वाटले. फलंदाजांनी जर बचावात्मक पवित्रा स्वीकारला तर गोलंदाजांसाठी आव्हान ठरते.’यादव पुढे म्हणाला,‘फलंदाज जर फटके खेळत नसतील तर गोलंदाजांसाठी आव्हान ठरू शकते. कारण त्यामुळे बाद करण्याच्या संधी कमी होतात. चांगला चेंडू टाकल्यानंतरही फलंदाज जर केवळ चेंडू थोपवत असेल तर त्याला बाद करणे कठीण होते. माझ्या मते, अशाप्रकारचे क्रिकेट कंटाळवाणे होते. कारण तुम्ही षटकानंतर षटके गोलंदाजी करीत असता, पण घडत काहीच नाही. आफ्रिका संघ अखेरच्या दिवशी दिवसभर बचावात्मक खेळून पराभव टाळू शकत नाही.’यादव पुढे म्हणाला,‘हो, त्यांच्यावर दडपण आहे, त्यामुळे ते प्रत्येक चेंडू थोपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सोमवारी सकाळी पहिल्या सत्रात त्यांना लवकर बाद करण्याचे आमचे पहिले लक्ष्य आहे. पूर्ण दिवसभर खेळून काढणे कठीण आहे. खेळपट्टीचे स्वरूपही बदलण्याची शक्यता आहे. आजही त्यांना नशिबाची साथ लाभली.’(वृत्तसंस्था)