शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल

By admin | Updated: June 2, 2016 03:14 IST

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये फेरबदलाची मागणी जोरात सुरू असून, राज्यसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पक्षात मोठ्या फेरबदलांना सुरुवात होईल

शीलेश शर्मा, नवी दिल्लीपाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये फेरबदलाची मागणी जोरात सुरू असून, राज्यसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पक्षात मोठ्या फेरबदलांना सुरुवात होईल. त्याची सुरुवात झाली असून, राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद देण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. राहुल गांधी यांच्या पसंतीचे नेते अनेक राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमले जाणार आहेत. जूनच्या दुसऱ्या आठवड्यांमध्ये हे बदल होतील, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, केंद्रीय पातळीवरील बदलांपूर्वी काही राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलले जातील. त्यात उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक असेल. तिथे पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. तेथील जातीय समीकरणे लक्षात घेता, तिथे नवा प्रदेशाध्यक्ष नेमला जाईल. बिहारमध्ये जातीय समीकरणांच्या आधारे नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड होईल. त्यानंतर अर्थातच महाराष्ट्र, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथे बदल होतील, असे सांगण्यात येते. अर्थात, या राज्यांतील बदलांना प्राधान्य दिले जाईल की, केंद्रीय बदलांनंतर ते केले जातील, हे सांगणे अवघड आहे.राहुल गांधी यांचे सारे लक्ष सध्या पंजाब व उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांकडे आहे. त्यासाठी रणनीती ठरवण्यासाठी प्रामुख्याने या सरचिटणीसांची मदत घेईल. यावेळी प्रथमच दोन्ही राज्यांत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र जाहरनामा तयार करण्याचे ठरवले जात आहे. उत्तर प्रदेशातील १५0 जागांचे लक्ष्य ठरवले असून, त्यासाठी प्रशांक किशोर यांच्या टीममधील १५0 जण या मतदारसंघांत तळ ठोकून आहेत. पंजाबमध्येही प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आता प्रशांत किशोर यांच्या कलेने पुढे जायचे ठरवले आहे. राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष करावे व प्रियांका गांधी यांनी सक्रिय राजकारणात यावे, अशी मागणी त्यांनी आजच केली.राहुल गांधी यांना अध्यक्षपद देतानाच, सोनिया गांधी यांना त्यावरील स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. शिवाय, थंडावलेले संसदीय मंडळाला पुनरुज्जीवित केले जाणार असून, सोनिया गांधी त्याच्या प्रमुख असतील. निवडणुकांसाठी उमेदवार या मंडळामार्फत निश्चित केले जातात. राहुल गांधी यांना सोबत स्वत:ची टीम लागेल. त्यामुळे अनेक उपाध्यक्ष हे त्यांच्या पसंतीचे तरुण व नवे चेहरे असतील.