शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
5
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
6
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
7
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
8
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
9
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
10
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
11
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
12
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
13
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
14
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
16
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
17
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
18
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
19
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
20
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली

दुख-या नसेवर बोट ठेवले म्हणूनच सोनियाजी अस्वस्थ

By admin | Updated: August 2, 2014 03:37 IST

माझ्या नव्या पुस्तकातील मजकुरावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया द्यावी यावरूनच माझ्या लिखाणाने त्यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले गेले

नवी दिल्ली : माझ्या नव्या पुस्तकातील मजकुरावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया द्यावी यावरूनच माझ्या लिखाणाने त्यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले गेले आहे व कशाने तरी त्या अस्वस्थ झाल्या आहेत हेच सिद्ध होते, असे माजी काँग्रेस नेते व माजी परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंग यांनी शुक्रवारी म्हटले.गांधी घराण्याचे एकेकाळचे विश्वासू परंतु संपुआ-१ सरकारमधून वादग्रस्त परिस्थितीत २००८ मध्ये परराष्ट्रमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागल्यापासून संबंध बिघडलेल्या ८३ वर्षांच्या नटवर सिंग यांचे ‘वन लाईफ इज नॉट इनफ’ हे आत्मचरित्रपर पुस्तक शुक्रवारी ग्रंथभांडारांमध्ये उपलब्ध झाले. त्यातील काही अंशांना पूर्वप्रसिद्धी मिळाल्यानंतर नव्या वादास तोंड फुटले होते.या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत नटवर सिंग यांनी असाही दावा केला की, माझ्या पुस्तकात मी सत्य समोर आणल्याबद्दल ५० काँग्रेसजनांनी फोन करून माझे अभिनंदन केले.२००४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सोनिया गांधी यांनी आपल्या अंतर्मनाची हाक ऐकून पंतप्रधान होण्यास नकार दिला, अशी वदंता काँग्रेसने पसरविली असली तरी ते खरे नाही. पंतप्रधान झाल्या तर वडील राजीव गांधी व आजी इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे त्यांचीही हत्या केली जाईल, या भीतीने चिरंजीव राजीव गांधी यांनी हट्टाने गळ घातल्यामुळेच सोनिया गांधी पंतप्रधान पदापासून दूर राहिल्या, असा दावा नटवर सिंग यांनी पुस्तकात केला आहे. यावर तीव्र प्रतिक्रिया देताना सोनिया गांधी गुरुवारी म्हणाल्या होत्या की, मी स्वत:च पुस्तक लिहीन म्हणजे सर्व काही तुम्हाला समजेल....मी लिहिणे हाच सत्य बाहेर येण्याचा मार्ग आहे... मी त्याविषयी गंभीर असून नक्कीच मी पुस्तक लिहीन. या लिखाणाने आपण जराही दुखावलो नसल्याचे आग्रहपूर्वक सांगून सोनियाजी असेही म्हणाल्या होत्या की, पती राजीव गांधी यांची हत्या व सासू इंदिरा गांधी यांची बंदुकीच्या गोळ््यांनी चाळण उडण्यासारख्या याहूनही कितीतरी भयंकर गोष्टी मी आयुष्यात अनुभवल्या आहेत.सोनिया गांधी या प्रतिक्रियेविषयी विचारता वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत नटवर सिंग म्हणाले की, माझ्या पुस्तकावर सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया देणे हेच लक्षवेधी आहे, कारण याआधी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारु यांच्या पुस्तकावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मी त्यांचा सल्लागार असतो तर काहीही न बोलता गप्प बसण्याचा सल्ला मी त्यांना दिला असता, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.सोनिया गांधी यांना आपली मते मांडण्याचा नक्कीच अधिकार आहे. त्यामुळे त्या लवकरच पुस्तक लिहितील, अशी आशा आहे व ते पुस्तक वाचण्याची माझी मनिषा आहे, असेही नटवर सिंग म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)