शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया, राहुल यांची कोर्टात हजेरी अटळ

By admin | Updated: December 8, 2015 02:13 IST

आता बंद पडलेले ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र प्रकाशित करणाऱ्या कंपनीचे अधिग्रहण करताना लबाडी आणि फसवणूक केल्याच्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या

नवी दिल्ली : आता बंद पडलेले ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र प्रकाशित करणाऱ्या कंपनीचे अधिग्रहण करताना लबाडी आणि फसवणूक केल्याच्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या खटल्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उद्या मंगळवारी दिल्लीच्या दंडाधिकारी न्यायालयात आरोपी म्हणून हजेरी लावणे अटळ झाले आहे.भाजपा नेते डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवर महानगर दंडाधिकाऱ्यांनी सोनिया व राहुल गांधी यांच्याखेरीज मोतीलाल व्होरा, आॅस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोडा व यंग इंडिया लि. या अन्य पाच आरोपींवर उद्या ८ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स गेल्या वर्षी २६ जून रोजी जारी करण्यात आले होते.सोनिया व राहुल गांधींची न्यायालयापुढील हजेरी टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील करून मंगळवारी सकाळी स्थगिती घेणे, एवढाच मार्ग शिल्लक आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयात अपील केले जाईल, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी सांगितले.1 ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे दैनिक पं. जवाहरलाल नेहरु यांनी १९३८ मध्ये सुरु केले. कालांतराने ते डबघाईला आले व २००८ मध्ये त्याचे प्रकाशन कायमचे बंद झाले तेव्हा ते चालविणाऱ्या असोशिएडेट जर्नल्स या कंपनीवर ९० कोटी रुपयांचे कर्ज होते. 2 ही कंपनी ज्या़ यंग इंडियन लि. कंपनीने ताब्यात घेतली त्यात सोनिया व राहुल गांधी यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा डॉ. स्वामी यांचा दावा आहे. 3 असोशिएटेड जर्नल्सवरील ९० कोटींचे कर्ज यंग इंडियनकडे वर्ग केले गेले. प्रत्यक्षात असोशिएडेड जर्नल्स कंपनीच्या विविध शहरांमधील सुमारे दोन हजार कोटी रुपये किंमतीच्या मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांचा व्यापारी विकास करण्याच्या हेतूने हा व्यवहार करण्यात आला, असा आरोप आहे.उच्च न्यायालयाच्या या आदेशात अनेक ‘कायदेशीर त्रुटी’ आहेत. हा सोनिया गांधी व राहुल गांधींना जबर हादरा मुळीच नाही. या व्यक्तीनिष्ठ बाबी आहेत. पक्ष केवळ आव्हानच देणार नाही तर सर्वप्रकारच्या कायदेशीर संसाधनांचा व मार्गाचा वापर करेल.-अभिषेक मनु सिंघवी, प्रवक्ते, काँग्रेस———————एवढी मोठी मालमत्ता कवडीमोलाने घेतली की असेच व्हायचे. कायदा त्याचे काम करीत आहे. सामान्य लोक आणि गांधी कुटुंबिय यांना कायदा सारखाच आहे. कायद्यातून ते (गांधी) पळू शकत नाहीत.-शाहनवाज हुसैन, प्रवक्ते, भाजपा