शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

काही लेखक पुरस्कार परत घेण्यास राजी

By admin | Updated: January 23, 2016 03:33 IST

देशातील कथित वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्यावरून आपले पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांची ‘नाराजी’ कमी होऊ लागली असून नयनतारा सहगल यांच्यासह अन्य

नवी दिल्ली : देशातील कथित वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्यावरून आपले पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांची ‘नाराजी’ कमी होऊ लागली असून नयनतारा सहगल यांच्यासह अन्य काही लेखक आपले पुरस्कार पुन्हा स्वीकारण्यास तयार झाले आहेत.साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी शुक्रवारी एका वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. साहित्य अकादमीने लेखकांना त्यांचे पुरस्कार परत करणे सुरू केले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांची भाची व सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांना आधीच त्यांचा पुरस्कार परत केला आहे. एक अन्य लेखक नंद भारद्वाज हेही आपला पुरस्कार परत स्वीकारण्यास राजी झाले आहे. अन्य लेखकांनाही त्यांचे पुरस्कार परत केले जातील, असे तिवारी यांनी सांगितले. लेखक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येवर साहित्य अकादमीची चुप्पी तसेच दादरी कांडानंतर देशात कथित असहिष्णुता वाढल्याच्या निषेधार्थ सुमारे ४० लेखकांनी मोदी सरकार व साहित्य अकादमीच्या विरोधात आपले पुरस्कार परत केले होते. या ‘पुरस्कार वापसी’ने देशातील वातावरण ढवळून निघाले होते. या पार्श्वभूमीवर साहित्य अकादमीने गत २३ आॅक्टोबरला सर्वसहमतीने सरकारविरोधी निषेधाचा ठराव पारित करून राज्य व केंद्र सरकारांना अशा घटना रोखण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन केले होते. शिवाय लेखकांना त्यांनी परत केलेले पुरस्कार पुन्हा ग्रहण करण्याची विनंती केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)