शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

जवानांनी वाळूवर भाजले पापड!

By admin | Updated: May 22, 2016 03:01 IST

संपूर्ण दक्षिण आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट पसरली आहे. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये तर सूर्य एवढा आग ओकू लागला आहे की, भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात सीमा सुरक्षा दलाच्या

जैसलमेर: संपूर्ण दक्षिण आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट पसरली आहे. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये तर सूर्य एवढा आग ओकू लागला आहे की, भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी चक्क तप्त वाळूवर पापड भाजले आणि भातही शिजविला. यावरून उष्णतेच्या दाहकतेचा अंदाज येऊ शकतो. परंतु एवढ्या जीवघेण्या गरमीतही जवान सीमेवर सतर्क राहून देशाचे संरक्षण करीत आहेत.जवानांच्या सांगण्यानुसार उष्णता एवढी जास्त आहे की एखाद्या भांड्यात पाणी आणि तांदूळ टाकून वाळूवर ठेवले तर जवळपास तीन तासात भात शिजून तयार होतो. आपल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे तापमानाची मोजमाप करणाऱ्या या जवानांनी केलेल्या दाव्यानुसार आतापर्यंत त्यांनी येथे कमाल ५५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे. १९५६ नंतर प्रथमच देशात कुठल्या ठिकाणी हे विक्रमी तापमान नोंदविण्यात आल्याचे सांगितले जाते. हवामान विभागाच्या सांगण्यानुसार शुक्रवारी जैसलमेरमध्ये ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.जवानांचा अनुभव बघता येथील उष्णता सहनशक्तीच्या पलीकडे आहे. बीएसएफचे जवान कॅप, हेडगिअर, विशिष्ट चष्मे परिधान करून पाण्याच्या बाटल्यांसह तैनात असले तरीही त्यांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. आम्ही गरम वाळूवर चालतो तेव्हा बुटांचे सोल वितळायला लागतात, असे जवानांनी सांगितले. येथे जवान समतळ भागात पायदळ आणि वाळूवर उंटांच्या मदतीने गस्त घालत असतात.