शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

जवानांनी वाळूवर भाजले पापड!

By admin | Updated: May 22, 2016 03:01 IST

संपूर्ण दक्षिण आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट पसरली आहे. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये तर सूर्य एवढा आग ओकू लागला आहे की, भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात सीमा सुरक्षा दलाच्या

जैसलमेर: संपूर्ण दक्षिण आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट पसरली आहे. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये तर सूर्य एवढा आग ओकू लागला आहे की, भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी चक्क तप्त वाळूवर पापड भाजले आणि भातही शिजविला. यावरून उष्णतेच्या दाहकतेचा अंदाज येऊ शकतो. परंतु एवढ्या जीवघेण्या गरमीतही जवान सीमेवर सतर्क राहून देशाचे संरक्षण करीत आहेत.जवानांच्या सांगण्यानुसार उष्णता एवढी जास्त आहे की एखाद्या भांड्यात पाणी आणि तांदूळ टाकून वाळूवर ठेवले तर जवळपास तीन तासात भात शिजून तयार होतो. आपल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे तापमानाची मोजमाप करणाऱ्या या जवानांनी केलेल्या दाव्यानुसार आतापर्यंत त्यांनी येथे कमाल ५५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे. १९५६ नंतर प्रथमच देशात कुठल्या ठिकाणी हे विक्रमी तापमान नोंदविण्यात आल्याचे सांगितले जाते. हवामान विभागाच्या सांगण्यानुसार शुक्रवारी जैसलमेरमध्ये ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.जवानांचा अनुभव बघता येथील उष्णता सहनशक्तीच्या पलीकडे आहे. बीएसएफचे जवान कॅप, हेडगिअर, विशिष्ट चष्मे परिधान करून पाण्याच्या बाटल्यांसह तैनात असले तरीही त्यांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. आम्ही गरम वाळूवर चालतो तेव्हा बुटांचे सोल वितळायला लागतात, असे जवानांनी सांगितले. येथे जवान समतळ भागात पायदळ आणि वाळूवर उंटांच्या मदतीने गस्त घालत असतात.