शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

स्मृती इराणींनी राजीनामा द्यावा - कन्हैय्या कुमार

By admin | Updated: March 15, 2016 16:35 IST

जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे

ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १५ - जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कन्हैय्या कुमारने पाच मागण्यांसह आझादी मोर्चा काढला होता त्यावेळी ही मागणीदेखील करण्यात आली. यावेळी बोलताना कन्हैय्या कुमारने आपल्याला विद्यापीठातून काढून टाकण्यासंबंधी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं सांगितलं आहे. 
 
स्मृती इराणी यांनी राजीनामा द्यावा, सोबतच देशद्रोहाचे आरोप मागे घेण्यात यावेत, आमच्या 2 विद्यार्थ्यांची कारागृहातून सुटका करण्यात यावी, विद्यापीठाच्या स्वायत्ततेत ढवळाढवळ करु नये आणि विद्यापीठांमध्ये जातीय निवडणुकीविरोधात कायदा करण्यात यावा या मागण्या या मोर्चादरम्यान करण्यात आल्या. मला कारणे दाखवा नोटीस मिळाली आहे मात्र विद्यापीठातून काढून टाकण्यासंबंधी काहीच माहिती मिळाली नसल्याचं कन्हैय्या कुमारने सांगितलं आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार 9 फेब्रुवारीला अफजल गुरुच्या समर्थनार्थ घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या चौकशीसाठी जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने नेमलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीने पाच विद्यार्थ्यांना काढून टाकण्याची शिफारस केली आहे. यामध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार, पीएचडीचा अभ्यास करणारा उमर खालिद आणि अर्निबन भट्टाचार्यचा समावेश आहे. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना नोटीसदेखील पाठवण्यात आली आहे. देशद्रोहाच्या आरोपाखाली सध्या उमर आणि अर्निबन न्यायालयीन कोठडीत आहेत तर, कन्हैया हंगामी जामिनावर बाहेर आहे.